मुंबई टाइम्स टीम
गणरायांना भावपूर्ण निरोप दिल्यानंतरही त्यांची सेवा करण्याचा घेतला वसा तरुणांनी सोडलेला नाही. विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर पडलेला कचरा, निर्माल्य, बूट-चपलांचा खच गोळा करून किनाऱ्यांची सफाई केली जातेय.
प्लास्टिकच्या बाटल्या, निर्माल्य, बूट आणि चपलांचा खच...मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जन सोहळ्यानंतर दरवर्षी दिसणारं हे चित्र. हा सगळा कचरा दूर करत पुन्हा एकदा चौपाट्यांवर स्वच्छता करण्यासाठी अनेक कॉलेजिअन्स पुढे सरसावले आहेत. अनेक कॉलेजांच्या एनएसएस, एनसीसी चमूंनी शुक्रवारी दादर, गिरगाव चौपाटी गाठून किनाऱ्यांची स्वच्छता करायला सुरुवात केली. सिद्धार्थ कॉलेज आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ही यातलीच दोन प्रातिनिधीक उदाहरणं.
फोर्टच्या सिद्धार्थ कॉलेजच्या एनसीसी नेव्हल विंगतर्फे गेले १५ दिवस केवळ किनाऱ्याची स्वच्छता करण्याचं कामच नव्हे, तर आगमन-विसर्जन मार्गामध्ये पडणारं निर्माल्य गोळा करण्याचं काम सुरू आहे. किनारे स्वच्छता मोहिमांमध्ये किनाऱ्यांवर गोळा होणारा कचरा उचलला जातो. मात्र विसर्जन मार्गात निर्माल्य मोठ्या प्रमाणावर टाकलं जातं. त्यामुळे ते गोळा करणं आवश्यक असल्याचं जाणवल्यामुळे कॉलेजच्या टीमनं तो कचरा गोळा करण्यावर भर दिला आहे. या मोहिमेतून जमा होणारा विघटनशील कचरा, निर्माल्य एकत्र करून तो दादरच्या एका स्वयंसेवी संस्थेकडे जमा केला जाणार आहे. ही मोहीम पुढचे तीन दिवस चालू राहणार आहे. यासाठी एनसीसी टीमच्या वेगवेगळ्या तुकड्या काम करतील. 'निर्माल्य आणि मूर्तींचे अवशेष यामुळे किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. या जमा होणाऱ्या निर्माल्याचं आणि विघटनशील कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर करून हे खत झाडांसाठी वापरले जाणार आहे. या मोहिमेमुळे आम्हा तरुणांनाही खूप ऊर्जा मिळत असते' असं सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेजच्या 'सोच' या विद्यार्थी संघटनेतील ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत वर्सोवा किनाऱ्यावर किनारा स्वच्छता मोहीम राबवली. या मोहीमेच्या माध्यमातूनअंदाजे १५ मेट्रिक टन कचरा या विद्यार्थ्यांनी जमा केला आहे.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यांवरुन, रस्त्यांवरुन गोळा केलेली पानं-फुलं, निर्माल्य एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. पर्यावरण राखण्याचा हा संकल्प खरं तर प्रत्येकानं करायला हवा. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणसंवर्धनाचं बीज पेरण्यासारखं आहे.
डॉ. सुनील कांबळे, उप-प्राचार्य, सिद्धार्थ कॉलेज
गणरायांना भावपूर्ण निरोप दिल्यानंतरही त्यांची सेवा करण्याचा घेतला वसा तरुणांनी सोडलेला नाही. विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर पडलेला कचरा, निर्माल्य, बूट-चपलांचा खच गोळा करून किनाऱ्यांची सफाई केली जातेय.
प्लास्टिकच्या बाटल्या, निर्माल्य, बूट आणि चपलांचा खच...मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जन सोहळ्यानंतर दरवर्षी दिसणारं हे चित्र. हा सगळा कचरा दूर करत पुन्हा एकदा चौपाट्यांवर स्वच्छता करण्यासाठी अनेक कॉलेजिअन्स पुढे सरसावले आहेत. अनेक कॉलेजांच्या एनएसएस, एनसीसी चमूंनी शुक्रवारी दादर, गिरगाव चौपाटी गाठून किनाऱ्यांची स्वच्छता करायला सुरुवात केली. सिद्धार्थ कॉलेज आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ही यातलीच दोन प्रातिनिधीक उदाहरणं.
फोर्टच्या सिद्धार्थ कॉलेजच्या एनसीसी नेव्हल विंगतर्फे गेले १५ दिवस केवळ किनाऱ्याची स्वच्छता करण्याचं कामच नव्हे, तर आगमन-विसर्जन मार्गामध्ये पडणारं निर्माल्य गोळा करण्याचं काम सुरू आहे. किनारे स्वच्छता मोहिमांमध्ये किनाऱ्यांवर गोळा होणारा कचरा उचलला जातो. मात्र विसर्जन मार्गात निर्माल्य मोठ्या प्रमाणावर टाकलं जातं. त्यामुळे ते गोळा करणं आवश्यक असल्याचं जाणवल्यामुळे कॉलेजच्या टीमनं तो कचरा गोळा करण्यावर भर दिला आहे. या मोहिमेतून जमा होणारा विघटनशील कचरा, निर्माल्य एकत्र करून तो दादरच्या एका स्वयंसेवी संस्थेकडे जमा केला जाणार आहे. ही मोहीम पुढचे तीन दिवस चालू राहणार आहे. यासाठी एनसीसी टीमच्या वेगवेगळ्या तुकड्या काम करतील. 'निर्माल्य आणि मूर्तींचे अवशेष यामुळे किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. या जमा होणाऱ्या निर्माल्याचं आणि विघटनशील कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर करून हे खत झाडांसाठी वापरले जाणार आहे. या मोहिमेमुळे आम्हा तरुणांनाही खूप ऊर्जा मिळत असते' असं सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेजच्या 'सोच' या विद्यार्थी संघटनेतील ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत वर्सोवा किनाऱ्यावर किनारा स्वच्छता मोहीम राबवली. या मोहीमेच्या माध्यमातूनअंदाजे १५ मेट्रिक टन कचरा या विद्यार्थ्यांनी जमा केला आहे.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यांवरुन, रस्त्यांवरुन गोळा केलेली पानं-फुलं, निर्माल्य एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. पर्यावरण राखण्याचा हा संकल्प खरं तर प्रत्येकानं करायला हवा. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणसंवर्धनाचं बीज पेरण्यासारखं आहे.
डॉ. सुनील कांबळे, उप-प्राचार्य, सिद्धार्थ कॉलेज