पण महानायक अमिताभ बच्चन या बाबतीत स्वत:ला खूप भाग्यवान समजतात, ज्यांना आयुष्याच्या या टप्प्यात मुलगा-सून व नातीसह राहण्याचा आनंद मिळत आहे. जेव्हा आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या घरी परतली होती, त्या क्षणी अमिताभ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ऐश्वर्याची कित्येक तास प्रसूती वेदनेमुळे तडफडत सुरू होती. ही माहिती देताना बिग बी भावूक देखील झाले होते. (फोटो-इंडिया टाइम्स/बीसीसीएल)
(या अटीमुळे शम्मी कपूर यांच्या वैवाहिक जीवनाला लागलं ग्रहण, मुलींसमोर आजही मुले ठेवतात अशा अटी)
जेव्हा वेदनेमुळे ऐश्वर्याची सुरू होती तडफड…
नात झाल्याची आनंदाची बातमी प्रसारमाध्यमांना सांगताना अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं की, 'आम्ही 14 नोव्हेंबरच्या रात्री ऐश्वर्याला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की बाळाची डिलिव्हरी आताही केली जाऊ शकते. दरम्यान 16 नोव्हेंबरला सकाळी ऐश्वर्याने लेकीला जन्म दिला. ऐश्वर्याची प्रसूती नॉर्मल होती. आजकाल लोक सी-सेक्शन आणि इतर पर्यायाची निवड करतात. पण ऐश्वर्या रायला नॉर्मल डिलिव्हरीच हवी होती. तिला खूप संघर्ष करावा लागला. मी तिचे कौतुक याकरीता करतोय की जवळजवळ दोन ते तीन तास तीव्र स्वरुपातील वेदना तिनं सहन केल्या आणि यासाठी तिनं कोणत्याही प्रकारचे औषधही घेतले नाही'. सामान्य प्रसूतीचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय पूर्णतः ऐश्वर्याचा होता. तिच्या या निर्णयास कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळाला.
नाजूक काळात आपल्या माणसांची येते आठवण
आजच्या काळात बहुतांश जण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहण्यास प्राधान्य देतात, हे नाकारता येणार नाही. कारण रोजगाराच्या शोधात लोक घर सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. तसेच बहुतांश महिलांना लग्नानंतर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायचे नसते. पण कधी-कधी काही लोकांना स्वतःच्या आवश्यकतेनुसार कुटुंबीयांची आठवण येते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावादरम्यान प्रत्येकानंच याचा जवळून अनुभव घेतला आहे.
(ऐश्वर्या रायला घरात पाहताच बिग बींना अश्रू अनावर, कारण असं की कोणीही विसरू नाही शकणार)
ऐश्वर्याने एकत्र कुटुंबाबद्दल व्यक्त केलं मत
जेव्हा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच ओपरा यांच्या शोमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते, तेव्हा होस्टने आश्चर्य व्यक्त केले की हे जोडपे अजूनही त्यांच्या पालकांसोबत एकत्रित राहत आहेत. त्यांनी विचारले, 'हे कसे जमते?' यावर अभिषेकने तिलाच प्रश्न विचारला की, 'आपण आपल्या कुटुंबासोबत राहत नाहीत का?' याचं उत्तर 'नाही' असं मिळालं. यावर अभिषेकनं म्हटलं की, आपल्या आईवडिलांसह एका छताखाली राहणे त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. तर ऐश्वर्यानंही सांगितलं की, 'एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणे इतकीही वाईट बाब नाही, उलट येथे वेगळीच आपुलकी तुम्हाला मिळते'
कुटुंबात एकत्रित राहणे वाईट बाब नव्हे
जेथे तुमच्या विचारांचा सन्मान केला जाईल, अशा कुटुंबामध्ये आपण लग्न करण्याचा निर्णय घेतला तर एकत्र कुटुंब पद्धतीत राहणे तुमच्याकरीता नेहमीच फायदेशीर ठरेल. ऐश्वर्याला हवे असते तर तिनं सासू-सासऱ्यांचं म्हणणं ऐकून सी-सेक्शनद्वारे आपल्या मुलीला जन्म देऊ शकली असती पण यानंतर तिला कित्येक समस्यांचा सामना करावा लागला असता, याची तिला माहिती होती. ऐश्वर्याने आपल्या कुटुंबीयांसह आपल्या मुलीच्या आरोग्याचीही काळजी घेतली. याच कारणामुळे ऐश्वर्या आपल्या सासू-सासऱ्यांची लाडकी आहे. एकूणच एकत्र कुटुंबात राहण्याचे फायदे अनेक आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो!
(‘अफेअर होतं, गर्भपातही झालाय' घटस्फोटावर समंथानं सोडलं मौन, महिलांवरच का होतात वैयक्तिक हल्ले?)