पण हे देखील खरे आहे की दोघींच्याही मनात एकमेकींविषयी खूप प्रेम आणि आदर आहे. हे तेव्हाच सिद्ध झालं जेव्हा ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून सुद्धा झाली नव्हती. जयाने करोडो लोकांसमोर त्या गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या बहुधा प्रत्येक सुनेला तिच्या सासूकडून कधीतरी ऐकण्याची अपेक्षा असते.
लोकांसमोर केल्या होत्या या भावना व्यक्त
एका पुरस्कार सोहळ्यात भाषण देत असताना जया बच्चन आपली होणारी सून ऐश्वर्या रायबद्दल उल्लेख करण्यास विसरल्या नाहीत. जया म्हणाल्या, 'मी पुन्हा एकदा एका अत्यंत प्रेमळ मुलीची सासू होणार आहे. जी संस्कार आणि सन्मानाने परिपूर्ण आहे आणि तिच्या चेह-यावर सतत एक सुंदर स्मित देखील असतं. मी माझ्या कुटुंबात तुझं स्वागत करते. माझं तुझ्यावर प्रेम आहे.'
(वाचा :- नात्यात हवाय काही दिवसांचा ब्रेक? मग ब्रेक घेताना घ्या 'या' गोष्टींची काळजी!)
सुरूवात असते खूप महत्त्वाची
सुरुवातीला पती-पत्नीचे नाते जितके नाजूक असते अगदी तितकेच नाजूक सासू आणि सूनेचे नाते देखील असते. हे यामुळे देखील आहे कारण हे नाते नेहमीच सकारात्मक कमी आणि नकारात्मक दृष्टिकोनातून अधिक पाहिले जाते. खरं जीवन असो किंवा मग रिल लाइफ, सासू-सूनेचे संबंध नेहमीच सर्वत्र नकारात्मक पद्धतीने दर्शविले जातात. अशा परिस्थितीत दोन्ही स्त्रियांनी पहिल्या भेटीपासूनच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे फार महत्वाचे असते.
(वाचा :- लग्नानंतर अनुष्का शर्मा सोडणार होती करियर! पण अचानक का देऊ लागली 'हा' सल्ला?)
सासू सुनेचे नाते असते नाजूक
मानसशास्त्रज्ञ रचना अवतरमानी यांच्या मते, सासू आणि सून यांचे नाते अतिशय नाजूक असते. यामागील मुख्य कारण म्हणजे मुलग असतो. जो दोन्ही महिलांच्या जीवनात मुख्य केंद्र असतो. तो आईसाठी मुलगा आहे, पत्नीसाठी पती असतो, म्हणून त्यांच्या भावना त्याच्यावरच केंद्रित असतात आणि नेहमीच दोघींचेही ध्येय हे त्याच्यासाठी चांगला विचार करणे हेच असते.
(वाचा :- भरगच्च भरलेल्या स्टुडिओमध्ये ऐश्वर्याला विचारला गेला सासू-सास-यांवरून प्रश्न, उत्तराने केलं थक्क!)
असं बनवा नातं हेल्दी
तज्ञांचे मत आहे की नातं कसंही असो पण त्यामध्ये एक सीमा आखणं फार महत्वाचं असतं. ही गोष्ट सासू आणि सून यांच्यावरही अवलंबून असते. मेंटल वेलनेस सेंटरमध्ये ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. इशिता मुखर्जी यांचे म्हणणे आहे की, सुनेने सासूचा विश्वास जिंकणे आणि बॉन्ड बळकट करणे फार महत्वाचे असते. यासाठी त्यांनी एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि संवाद देखील साधला पाहिजे.
(वाचा :- ‘सिंगल मुली ठेवतात कोणाशीही संबंध’ हे वादग्रस्त वक्तव्य करण्यामागे या अभिनेत्रीच्या काय आहेत भावना?)
घरातील गोष्टी एकत्र मिळून ठरवा
घराशी संबंधित गोष्टींबद्दल बहुतेकदा सासू आणि सून यांच्यात भांडणं होताना दिसून येतात. याला कारणीभूत भिन्न स्वभाव, विचार आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची वेगवेगळी पद्धत असते. हे टाळण्यासाठी नातेसंबंध तज्ञ सासू आणि सुनेला घराचे नियम एकत्र मिळून ठरविण्याचा सल्ला देतात. ते असेही सुचवतात की या गोष्टींबद्दल बोलताना सूनने कधीही वयाच्या घटकाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा तिचं बोलणं सासूला दुखावू शकतं.
(वाचा :- लग्नानंतर सासरी गेलेल्या रेखासोबत घडली होती ‘ही’ भयानक घटना, यामुळे पुन्हा लग्न केलंच नाही!)