दोघांचाही स्वभाव आहे वेगवेगळा
अजय देवगन आणि काजोल हे एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाचे आहेत यात शंकाच नाही. एकाला शांत राहून आणि विचार करून बोलणे आवडते, तर दुसर्याला मनापासून हसणे आणि भावना-विचार व्यक्त करणे आवडते. या विरुध्द व्यक्तिमत्त्वांशी संबंधित फक्त एकच गोष्ट अशी आहे जी अजयला अजिबात आवडत नाही आणि तो काजोलवर कायम यावरून भडकतो.
(वाचा :- ‘या’ खास गोष्टींमुळेच रूबीना दिलैक बनली Bigg Boss 14 ची विजेती!)
काजलची ही सवय अजयला अजिबात आवडत नाही
काजोल ही एक अशी अभिनेत्री आहे जी कॅमेर्यासमोर बोलण्यात अजिबात संकोच मानत नाही. हीच गोष्ट त्यांच्या वैयक्तिक जीवनातील संवादांचा देखील एक भाग आहे. काजोलचे एकदम स्पष्ट बोलणे आणि आपले मत जसे आहे तसे सादर करणे अजय देवगनच्या रागाचे कारण ठरते. काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा जेव्हा ती असे करते तेव्हा अजय तिच्यावर चिडतो आणि नाराजी व्यक्त करतो. ती असंही म्हणाली की असे असूनही तिला मुत्सद्दी बनताच येत नाही.
(वाचा :- ‘या’ गोष्टी सांगतात की लग्नानंतर पती म्हणून नेमके तुम्ही कसे असाल!)
ही सवय नातं करते खराब
काजोल म्हणाली होती की तिच्या या सवयीमुळे तिचा नवरा म्हणजेच अजय देवगनला इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या लोकांसमोर असताना अडचण निर्माण होते. तिने कबूल केले की ती भाग्यवान आहे म्हणून बहुतेक लोक तिच्या शब्दांकडे लक्ष देत नाहीत आणि तिला लगेच माफ करतात. काजोलने सांगितले त्याप्रमाणे तिच्या स्वभावातील काही गोष्टी अजयला संकटात आणतात, अगदी तसंच प्रत्येक जोडप्याच्या बाबतीत तेव्हा घडतं जेव्हा जेव्हा त्यांचा जोडीदार विचार मांडताना किंवा मत व्यक्त करण्यापूर्वी विचार करत नाहीत.आपण कोणाशी बोलत आहात आणि काय बोलत आहात? याबद्दल कायम सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. असं न करणं आपल्याला मित्रमंडळी, नातलग आणि सहका-यांपासून दूर नेऊ शकतं.
(वाचा :- दिया मिर्जाचं कन्यादान व पाठवणी झालीच नाही, झपाट्याने बदलत आहेत लग्नातील ‘या’ ५ गोष्टी!)
बोलायचंच असेल तर…
एखाद्या परिस्थितीत आपल्याला मनमोकळेपणाने बोलावे असे वाटले किंवा कोणत्या ठिकाणी तसं परखड बोलणं आवश्यक असेल तर व्यक्त होताना शब्दांची काळजीपूर्वक निवड करा. आपली वाक्ये अशी असावी की ज्यामुळे समोरच्याला त्रास किंवा दु:ख वाटणार नाही किंवा आपल्या बोलण्याने परिस्थिती आणखी वाईट होणार नाही. ही गोष्ट आपल्याला आणि आपल्या जोडीदारालाही लाजिरवाण्या परिस्थितीत अडकण्यापासून वाचवते.
(वाचा :- अरेंज्ड मॅरेज करण्याआधी ‘या’ ५ पद्धतींनी जोडीदाराचा स्वभाव ओळखा व वाढवा नात्यातील प्रेम!)
शांत राहणे
कधी कधी परिस्थिती वाईट असते किंवा वातावरण गरम असतं. अशावेळी नात्यातील वाद टाळण्यासाठी शांत राहणंही चांगलं असतं. आपल्या बोलक्या, मनमोकळ्या स्वभावामुळे आपल्यालाच दु:ख होईल असं वागणं म्हणजे स्वत:च्याच पायावर कु-हाड मारून घेण्यासारखं असतं. असं म्हणतात शरीरावरील घाव वेळेप्रसंगी भरून निघतात पण मनावरील नाही. शब्दांचा तीर खोलवर रूततो म्हणून शब्द कितीही फुकट असले तरीही ते सांभाळून वापरणंच शहाण्याचं लक्षण ठरू शकतं.
(वाचा :- नात्यात रोमांस असावा पण इतकाही नाही की चुकून थेट स्मशानभूमीत पोहचाल! वाचा खरी घटना)