ज्याप्रमाणे कधी कधी एखाद्या सामन्य कपलला आपले रिलेशनशिप टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात किंवा प्रयत्न करावे लागतात त्याचप्रमाणे सेलिब्रेटी कपल्सना देखील तेवढीच मेहनत करावी लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सर्वात प्रसिद्धी सेलिब्रेटी कपल्सची अशी सिक्रेट्स, ज्यातून आपल्याला समजेल की रिलेशनशिप हेल्दी आणि आनंदी ठेवण्यासाठी काय काय कसरत करावी लागते.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली असे कपल आहेत जे नेहमीच एलिगेंट दिसून येतात. हे कपल सेलिब्रेटी असून सुद्धा डाऊन टू अर्थ आहेत शिवाय आपल्या पर्सनल लाईफला लाईमलाईटपासून शक्य तेवढे दूर ठेवतात. याबाबत एक गोष्ट शेअर करताना अनुष्का म्हणाली होती की,“मी आयुष्याची मागची काही वर्षे खूप काम केले आहे. पण आता मला थोडासा स्पीड कमी करावासा वाटतो आहे. संसारासाठी वेळ देणे मला योग्य वाटते आहे. विराट सोबत वेळ घालवणे मला महत्त्वाचे वाटते. अनेकदा कित्येक काळ आम्ही सोबत नसतो. अशावेळी जेवढा वेळ मिळेल तेवढा त्याच्यासोबत व्यतीत करण्यावर मी भर देते.”
प्रियांका चोप्रा जोनस
प्रियांका चोप्रा देखील आपल्या संसारात खूप जास्त खुश आहे. पण दोघांचे प्रोफेशनच असे आहे की कित्येक आठवडे त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवता येत नाही. एकमेकांना ते प्रायोरिटी देऊ शकत नाहीत. म्हणूनच काही झाले तरी नात्यातील भावनांमध्ये कमतरता येऊ नये याची काळजी दोघे घेतात. एका मुलाखतीत प्रियांका म्हणाली होती की, “आम्हाला जेवढं प्रेम आमच्या जॉबवर आहे तेवढंच आमचं एकमेकांवर देखील प्रेम आहे. त्यामुळे आमच्यात कधीच त्यावरून वाद होत नाही. शक्य तितकी प्रायोरीटी आम्ही एकमेकांना देतो.”
शाहरुख खान
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांची लव्हस्टोरी तर खूप जास्त प्रसिद्ध आहे. आजही दोघे एकत्र आहेत आणि त्यांचा संसार बहारदार आहे यातच सर्व काही आलं. शाहरुख हा मेगा स्टार हे आणि त्यामुळे कधी कधी त्याच सुद्धा संसारकडे दुर्लक्ष होतं, पण तो याचे श्रेय आपल्या पत्नीला देताना म्हणतो की, “तिने आजवर संसार सांभाळला. माझी प्रत्येक गोष्ट समजून घेतली. म्हणूनच मी तिचा खूप आदर करतो.” शाहरुख नेहमी म्हणतो की ज्या नात्यात कपल एकमेकांचा आदर करतात ते नाते कधीच फोल ठरणार नाही.
दीपिका पादुकोण
रणवीर कपूर आणि दीपिका पादुकोण हे तर आजच्या पिढीचे सर्वात आवडते कपल आहे. लग्नाआधी अनेकांनी अंदाज लावले होते की काही झालं तरी हे लग्न टिकणार नाही. दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. ते एकमेकांना समजून घेणार नाहीत. पण दोघांनी देखील सर्वांना खोटे ठरवले आणि आज दोघेही सुखाचा संसार करत आहेत. दीपिकाने एक गोष्ट कबूल केली की, “लग्नाआधी आम्हालाही मनात खूप धाकधूक होती. पण जस जसे दिवस जाऊ लागले तसतसे आमचे नाते अधिक जास्त घट्ट होऊ लागले. आमच्या नात्याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांप्रती खूप प्रामाणिक आहोत. नात्यात प्रामाणिकपणा असेल तर कसलंच टेन्शन नाही. ना संशय असतो ना अजून काही. उरतं फक्त प्रेम आणि तुमचं नातं टिकतं”
(वाचा :- गर्लफ्रेंड करते इग्नोर, मग या पाच गोष्टींवर द्या जोर, मजबूत होईल नात्याची दोर)
सोनम कपूर अहुजा
आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करणे यापेक्षा सुंदर गोष्ट कोणती असेल? सोनम सुद्धा आनंद सोबत आज लग्न करूनच याच फिलिंगचा अनुभव घेते आहे. तिच्यासाठी तोच जग आहे आणि तिच सर्वस्व आहे. आनंदचे देखील सोनमवर खूप जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच त्यांचे नाते हे बॉलीवूडमध्ये एक आदर्श मानले जाते. सोनम म्हणते की, “जेव्हा गोष्ट एकमेकांना वेळ देण्याची असते तेव्हा आम्ही आमच्या समोर काय काम आहे याचा विचारही करत नाही आणि सरळ ते काम कॅन्सल करून टाकतो. हीच गोष्ट आमच्या नात्याला अधिक घट्ट बनवते.” ती इतर जोडप्यांनाही हाच सल्ला देते की नात्यापुढे वेळ आणि इतर गोष्टींचा विचारही करू नये.