मुंबई टाइम्स टीम
ब्रेक अप झाल्यानंतर स्वाभाविकपणे शिक्षण, करिअर किंवा वास्तव आयुष्यात जगण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्यात मन रमत नाही. मात्र, तुटलेलं नातं जुने मित्र परत मिळवून देतं आणि नव्या नात्यात अधिक जागरुकतेनं पाऊल ठेवायला शिकवतं... प्रेमभंगाचा असा कधी विचार केला आहे का?
‘ब्रेक अप’... प्रेमाच्या जादुई दुलईतून बाहेर ओढून काढून वास्तवाचे काटे टोचून खडबडून जागं करणारी एक दुखरी सल! अर्थात, एकदा ‘मूव्ह ऑन’ होऊ लागल्यावर मात्र ब्रेक अपच्या तोट्यांपलीकडे दडलेल्या फायद्यांचीही जाणीव होऊ लागते.
प्रेमभंग पचवणं यासारखी कठीण गोष्ट कोणतीही नाही; पण वेळेसारखं प्रवाही झालं, की आपोआप त्यातून बाहेर पडता येतं. त्यानुसार वागण्यात थोडेसे बदल केले, की मग प्रेमभंगाचेही फायदे दिसायला लागतात.
केलेल्या जीवापाड प्रेमाची किंमतच ठेवली गेली नसेल, तर पुन्हा प्रेम करण्याच्या बाबतीत कचरणं साहजिक आहे. नव्याने झालेल्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात व्हायला लागलं, की आपण दचकतो. ते नातं अनेक शंका घेऊन पुढे जाऊ लागतं आणि कदाचित पूर्वानुभवातील दुःखामुळे मग खरोखरंच चांगलं काही निर्माण होऊ घातलेलं नातं अचानक तुटतं, थांबतं, नात्यातलं पुढचं पाऊल टाकताना अडखळतं. त्यामुळे असलेली मैत्रीही तुटण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, प्रेमभंगाचा अनुभव अगदीच काहीच शिकवत नाही, असं नाही, तर आयुष्यात पुढे कधीतरी अशी व्यक्ती येईल, जी खरोखरीच आपल्या प्रेमाला पात्र ठरू शकेल, हा आत्मविश्वास आपल्याला पूर्वानुभवातील तुटलेल्या नात्यामुळेच मिळू शकतो. आगामी काळातील नात्यांबाबत तो अनुभव आणखीन सुजाणही करून जातो.
कोणतीच गोष्ट चिरकाल टिकत नाही, हे कटू सत्य ब्रेक अपनंतर भेटीला येतं. मग हीच क्षणभंगुरता आपल्या अंगवळणी (खरंतर मनवळणी) पडते आणि पुढच्या नात्यात जोडीदाराकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षांवर निर्बंध लादायला मदत करते. पूर्वी झालेल्या चुका टाळायलाही मदत होते, ती ब्रेक अपचीच.
प्रेमभंग झाल्यानंतर ते दुःख कुरवाळत बसून ‘प्रेम फक्त एकदाच होतं’ असा विचार करत हताश होण्याची गरज नाही. अशा वेळी सुरू झालेल्या किंवा ठरवून सुरू केलेल्या नवीन आयुष्यात नवीन जोडीदाराला येण्यासाठी हृदयाचं दार उघड ठेवणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा प्रेम करण्यासाठी या तुटलेल्या नात्यातूनच उभारी मिळते.
आधी आपल्या जोडीदारासाठी ज्या मित्रांना बाजूला सारलं, तेच पुढे आपल्याला सावरायला मदत करतात. ब्रेक अपनंतर जुन्या मित्रांबरोबरची वीण आणखीन घट्ट होऊन जाते, तर नवीन मित्रांना आयुष्यात प्रवेश मिळतो.
ब्रेक अप झाल्यानंतर स्वाभाविकपणे शिक्षण, करिअर किंवा वास्तव आयुष्यात जगण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्यात मन रमत नाही. मात्र, तुटलेलं नातं जुने मित्र परत मिळवून देतं आणि नव्या नात्यात अधिक जागरुकतेनं पाऊल ठेवायला शिकवतं... प्रेमभंगाचा असा कधी विचार केला आहे का?
‘ब्रेक अप’... प्रेमाच्या जादुई दुलईतून बाहेर ओढून काढून वास्तवाचे काटे टोचून खडबडून जागं करणारी एक दुखरी सल! अर्थात, एकदा ‘मूव्ह ऑन’ होऊ लागल्यावर मात्र ब्रेक अपच्या तोट्यांपलीकडे दडलेल्या फायद्यांचीही जाणीव होऊ लागते.
प्रेमभंग पचवणं यासारखी कठीण गोष्ट कोणतीही नाही; पण वेळेसारखं प्रवाही झालं, की आपोआप त्यातून बाहेर पडता येतं. त्यानुसार वागण्यात थोडेसे बदल केले, की मग प्रेमभंगाचेही फायदे दिसायला लागतात.
केलेल्या जीवापाड प्रेमाची किंमतच ठेवली गेली नसेल, तर पुन्हा प्रेम करण्याच्या बाबतीत कचरणं साहजिक आहे. नव्याने झालेल्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात व्हायला लागलं, की आपण दचकतो. ते नातं अनेक शंका घेऊन पुढे जाऊ लागतं आणि कदाचित पूर्वानुभवातील दुःखामुळे मग खरोखरंच चांगलं काही निर्माण होऊ घातलेलं नातं अचानक तुटतं, थांबतं, नात्यातलं पुढचं पाऊल टाकताना अडखळतं. त्यामुळे असलेली मैत्रीही तुटण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, प्रेमभंगाचा अनुभव अगदीच काहीच शिकवत नाही, असं नाही, तर आयुष्यात पुढे कधीतरी अशी व्यक्ती येईल, जी खरोखरीच आपल्या प्रेमाला पात्र ठरू शकेल, हा आत्मविश्वास आपल्याला पूर्वानुभवातील तुटलेल्या नात्यामुळेच मिळू शकतो. आगामी काळातील नात्यांबाबत तो अनुभव आणखीन सुजाणही करून जातो.
कोणतीच गोष्ट चिरकाल टिकत नाही, हे कटू सत्य ब्रेक अपनंतर भेटीला येतं. मग हीच क्षणभंगुरता आपल्या अंगवळणी (खरंतर मनवळणी) पडते आणि पुढच्या नात्यात जोडीदाराकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षांवर निर्बंध लादायला मदत करते. पूर्वी झालेल्या चुका टाळायलाही मदत होते, ती ब्रेक अपचीच.
प्रेमभंग झाल्यानंतर ते दुःख कुरवाळत बसून ‘प्रेम फक्त एकदाच होतं’ असा विचार करत हताश होण्याची गरज नाही. अशा वेळी सुरू झालेल्या किंवा ठरवून सुरू केलेल्या नवीन आयुष्यात नवीन जोडीदाराला येण्यासाठी हृदयाचं दार उघड ठेवणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा प्रेम करण्यासाठी या तुटलेल्या नात्यातूनच उभारी मिळते.
आधी आपल्या जोडीदारासाठी ज्या मित्रांना बाजूला सारलं, तेच पुढे आपल्याला सावरायला मदत करतात. ब्रेक अपनंतर जुन्या मित्रांबरोबरची वीण आणखीन घट्ट होऊन जाते, तर नवीन मित्रांना आयुष्यात प्रवेश मिळतो.