अ‍ॅपशहर

कुठंतरी, काहीतरी... चुकतंय!

आज रिलेशनशिपमध्ये, तर उद्या ब्रेकअप…अशी अनेक उदाहरणं तुम्हाला वारंवार पाहायला मिळत असतील. यामागे आहे कमिटमेंट फोबिया. नेमका काय असतो हा?

शब्दुली कुलकर्णी | Maharashtra Times 7 Jun 2017, 3:22 am
आज रिलेशनशिपमध्ये, तर उद्या ब्रेकअप…अशी अनेक उदाहरणं तुम्हाला वारंवार पाहायला मिळत असतील. यामागे आहे कमिटमेंट फोबिया. नेमका काय असतो हा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम commitment fobia
कुठंतरी, काहीतरी... चुकतंय!


आर्या- अरे रोहन, तू आणि रिया आजकाल एकत्र दिसत नाही.
रोहन- नाही गं, आमचं जरा बिनसलंय.
आर्या- अरे, गेल्या महिन्यातच तुम्ही रिलेशनशिपमध्ये आलात ना, आणि महिन्याभरातच तुमचं बिनसलं?

असे संवाद कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतायत का? सध्या हे संवाद अनेक कट्ट्यांवर ऐकायला मिळतात. याचं कारण आहे कमिटमेंट फोबिया. नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'चि. व चि. सौ. कां' व 'मुरांबा' या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर 'कमिटमेंट फोबिया'ची एक झलक बघायला मिळाली.

वारंवार होणाऱ्या या ब्रेकअप-पॅचअपवर घरातल्या मोठ्या मंडळींकडून नेहमी टीका केली जाते. 'नातेसंबंध म्हणजे आजकालच्या मुलांना जणू खायची गोष्ट वाटते. आज एकाला धरलं, उद्या त्याला सोडलं, परत परवा कुणा तिसऱ्याबरोबर फिरायला ही मुलं मोकळी असतात', अशा शब्दांत खरपूस समाचार घेतला जातो. नातेसंबंधात कमिटमेंट, अर्थात वचनबद्धता आली म्हणजे जबाबदारी ही आलीच. हीच जबाबदारी पेलण्यासाठी आजची तरुणाई कचरतेय. त्यामुळे नातेसंबंधांपासून पळण्याचा पर्याय स्वीकारला जातो, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे 'लिव्ह इन रिलेशनशिप'सारखे सोयीचे पर्याय निवडले जातात. कमिटमेंट फोबिया होण्यामागे अनेक कारणं आहेत. मुळात तरुणाईची सध्याची मानसिकता हे यामागचं प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

प्रमुख कारणं

जबाबदारी स्वीकारण्याची नसलेली मानसिकता.

पालकांच्या नातेसंबंधामध्ये असलेले ताणतणाव.

भूतकाळातले वाईट अनुभव.

धरसोडीची मानसिकता

जबाबदारीची भीती

नातेसंबंधांमध्ये बांधिलकी आली की अनेक जबाबदाऱ्या या ओघाने आल्याच. या जबाबदाऱ्यांचा कधी कंटाळा येतो, कधी त्यांचं ओझं वाटतं. तर कधी त्या पेलण्याची मानसिक तयारी नसते. त्यामुळे कमिटमेंट फोबिया असलेल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. परिणामी, एका नात्यातून दुसऱ्या नात्यात अडकण्याकडे कल वाढतो. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणं कठीण असतं. त्यामुळे कोणतेही नातेसंबंध स्वीकारताना त्याचा सर्वतोपरी विचार होणं आवश्यक आहे. अशा धरसोडीमुळे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसंच दुसऱ्या व्यक्तीलाही अनेक प्रकारच्या मानसिक अडचणींना किंवा मानसिक कोंडीला सामोरं जावं लागतं.

- डॉ. अनुप भारती, मानसोपचारतज्ज्ञ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज