अ‍ॅपशहर

व्हाय मी...?

माझ्याकडे एक जुनी मैत्रीण खूप वर्षांनी आली होती. सुरळीच्या वड्या, स्ट्रॉबेरी शेक घेतल्यावर पोटभर गप्पा, असा माझा प्लॅन होता. पण तेवढ्यातच तिचा नाराजीचा सूर आला ‘अगबाई, तुला बरं एवढ जमतं माझं मेलीच नशीबच फुटकं. एक काम धड होत नाही’. हे वाक्य ऐकवल्यानंतर ती सुरुच झाली.

Maharashtra Times 19 Sep 2016, 9:03 am
डॉ. शामा जगदीश कुलकर्णी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dont say why me say try me
व्हाय मी...?


माझ्याकडे एक जुनी मैत्रीण खूप वर्षांनी आली होती. सुरळीच्या वड्या, स्ट्रॉबेरी शेक घेतल्यावर पोटभर गप्पा, असा माझा प्लॅन होता. पण तेवढ्यातच तिचा नाराजीचा सूर आला ‘अगबाई, तुला बरं एवढ जमतं माझं मेलीच नशीबच फुटकं. एक काम धड होत नाही’. हे वाक्य ऐकवल्यानंतर ती सुरुच झाली. आत्ता बघ तुझाकडे यायला निघाले तर गाडी चालू होत नव्हती. एकदाची निघाले तर पेट्रोल संपलं. पुढे आले तर हवा कमी. यातच इतका वेळ गेला की, आता तू दिलेली डिश कशीबशी पटपट घशाखाली घालणार की टिंकूला घ्यायला शाळेत जावं लागणार. नेहमी फक्त माझेच तेवढं असं होतं. बाकी कुणाच्या नशिबात एवढे अडथळे नसतील. आत्ता पिंकीच्या लग्नाचं पहायचं, तर त्यातही सगळ्या अडचणी. माझं लग्नच तेवढं बिना अडचणीच झालं होतं म्हणा. पण तेच झालं नसतं तर आज मी सुखी झाले असते. असा अखंड तिचा नकारात्मक सूर सुरूच होता.

असा विचार करणारी या जगात ती एकटी नाही. जिथे जिथे आपल्या अपेक्षेचा भंग होतो, तिथे माणूस ‘व्हाय मी?’ या मोडमध्ये जातो. मग ती चुकलेली बस असो की, चुकलेला पैशाचा हिशोब. जगामधे आपण जे काही वाक्य मनात बोलतो त्याची सूक्ष्म कंपने निर्माण होऊन, तसे आयुष्य समोर येतं. म्हणून तर जगात अत्यंत यशस्वी व्यक्ती त्या असतात ज्या ध्येयनिश्चिती करूनच त्याप्रमाणे आयुष्य जगतात. माझ्या आयुष्याचा मार्ग खडतर काटेरी आहे, असं मानणाऱ्या व्यक्तीला आयुष्यातील अडचणी, त्रासदायक प्रसंगांनाच सामोरं जावं लागतं. जीवन खूप सुंदर, निर्मळ असतं. आपण त्यामधे विविध रंग भरत असतो. माणूस मनात स्वगत काय बोलतो हे खूप महत्त्वाचं आहे. ‘माझंच इतकं वाईट का?’, असं वाक्य बदलायचं असेल तर आपल्याकडे असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा चांगला विचार आपल्या मनात आणायला हवा. जुने लोक सांगतात, सकाळी उठल्यावर आभार मानणं यासाठी विशेष वेळ द्यायला हवा. ही किती सुंदर संकल्पना आहे! आपण आजची सुंदर सकाळ बघण्यास जिवंत आहोत. या जगातील ऑक्सिजनमुळे जिवंत आहोत. आपले केसापासून पायाच्या नखापर्यंत सारे अवयव निरोगी आहेत. अशाप्रकारच्या साऱ्या सुंदर सकारात्मक विचारांनी उठताक्षणी मन प्रफुल्लीत करावं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज