दरम्यान दुसरा पर्याय निवडणे आणि त्याची अंमलबजावणी करणे तितकेसे सोपे नाही. पाच महिलांनी स्वतःची गोष्ट शेअर करून असाच काहीसा अनुभव सांगितला. अफेअरनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनावर कसे परिणाम झाले, हे त्यांनी स्वतः सांगितले. (सर्व सांकेतिक फोटो : istock by getty images, इंडियाटाइम्स)
(प्रियंका-निकनं १४४ कोटी रूपयांच्या घरात लावलीय या खास क्षणाची फोटोफ्रेम, सप्तपदीचं आहे खूप महत्त्व)
पतीनं माझा विश्वासघात केला, मग मी सुद्धा…
स्नेहा (वय ३५ वर्षे) सांगते की, माझ्या पतीचे त्याच्या सेक्रेटरीशी संबंध होते आणि तो माझी फसवणूक करत होता, हे सर्व पाहून मी ठरवले की मी यापुढे एक चांगली पत्नी असल्याचे ढोंग करू शकत नाही आणि त्याचा विश्वास तोडण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तीसोबत नातेसंबंध निर्माण केले. त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही. यादरम्यान आम्ही खूप रडलो आणि एकमेकांवर आरोप केले. जे काही घडलंय त्यानंतर आम्ही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांच्या या पैजेमुळे शिल्पा शेट्टीची प्रेमात झाली फसवणूक, अशा मैत्रीत होते फक्त नुकसान
पतीला सत्य सांगितलं, पण संसाराची घडी विस्कटली
कशिशने (वय ३७ वर्षे) सांगितलं की, 'मी पतीचा विश्वासघात केला, कारण कदाचित त्यानं माझ्याकडे दुर्लक्ष केले किंवा मी पुन्हा प्रेमात पडले. मला त्याच्याकडे प्रेम आणि आपुलकीची भीक मागायची नव्हती, म्हणून माझ्याकडून त्याची फसवणूक झाली. पण हे केल्यानंतर मला खूप वाईट वाटले आणि मी माझ्या पतीला सर्व काही सांगितले. तेव्हापासून आमचं लग्न सक्तीच्या नात्याप्रमाणे झालं आहे, माझ्या नवऱ्याने मला विचारलंही नाही की मी असं का केलं?'
(ईशा-करीनाच्या खास मैत्रीत या चुकीमुळे पडला मिठाचा खडा, असा हस्तक्षेप कोणालाही नाही आवडणार)
आम्ही कपल थेरपी घेण्याचे ठरवले
तनिषा (वय ४४ वर्षे) यांनी आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं की, 'पतीने माझा विश्वासघात केल्याची माहिती मला समजली. तेव्हा मी त्याच्याशी संवाद साधणे पूर्णतः बंद केले. आवश्यकता असल्यास केवळ मेसेजच्या माध्यमातून मी बोलत असे. कारण त्याला पाहिल्यानंतर माझ्या मनाला फार दुःख होत असे. कारण त्यानं माझा विश्वासघात केला होता. यानंतर सहमतीने आम्ही कपल थेरपी घेण्याची तयारी दर्शवली आणि मग हळूहळू मी त्याला माफ केले. आता आमचे वैवाहिक जीवन जवळपास योग्य दिशेनं वाटचाल करत आहे.'
विभक्त होणे इतके सोपे नाही
सृष्टी (वय ४२ वर्षे) यांनी सांगितलं की, विश्वासघाताचा सामना केल्यानंतर जोडीदाराला सोडणे इतके सोपे नसते. दुर्दैवाने कॉलेजमध्येच माझी व माझ्या पतीची भेट झाली. तेव्हापासूनच मी त्याला ओळखते आणि तो माझ्यासाठी सर्वस्व होता. ज्या व्यक्तीसोबत आपण दोन दशकांहून अधिक काळ घालवलाय त्याच व्यक्तीनं तुमची फसवणूक केलीय, यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे. मी माझ्या पतीवर यापुढे अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. तो माझी फसवणूक करत नाहीय, असे त्यानं कितीही वेळा म्हटलं तरीही विश्वास करणं अशक्यच. मला त्याला सोडायचे आहे. पण मला भीती वाटते की मी पूर्णतः एकटी होईन'
(सुष्मिता सेनबद्दल बॉयफ्रेंडने केलं मोठं विधान, बहुतांश पुरुषांकरीता ही गोष्ट नसते सोपी)
मुले आहेत प्राधान्य
आकांक्षा (वय ३२ वर्षे) यांनी खासगी आयुष्याबाबत सांगितलं की, 'जवळपास वर्ष झालंय, पती व माझ्या नात्यात काहीही चांगले सुरू नाहीय. व्यावसायिक कामानिमित्त दौऱ्यावर असताना मी माझ्या पतीची फसवणूक केली. आता मी माझ्या नवऱ्यावर प्रेमही करत नाही, पण तरीही त्याच्यासोबत राहायचं आहे, कारण तो माझ्या मुलांचा बाप आहे. जोपर्यंत माझे मूल मोठे व समजूतदार होत नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्यातील वडिलांची जागा व प्रेम मला हिरावून घ्यायचे नाही'
(बच्चन कुटुंबीयांच्या घरात यंदाच्या दिवाळीत पसरली शांतता, या कारणामुळे अनेक नाती झाली आहेत उद्ध्वस्त)
इंग्रजी भाषेमध्ये हे आर्टिकल वाचण्याकरीता येथे क्लिक करा