आयुष्यात आनंदाचे क्षण जपायचे असतात; कारण उतारवयात हेच क्षण जगणं सुसह्य करतात. हे क्षण सोनेरी करतात ते आपले दोस्तमंडळी. मला अशीच मैत्रीण लाभली हे मी माझं भाग्य समजते. तिचं नाव नयना.
मराठवाड्यातल्या हिंगोलीसारख्या लहान गावातून मी पुण्यात शिकायला आले. एस. पी. कॉलेजला अॅडमिशन मिळवली. त्यावर्षी कॉलेजचा पन्नासावा महोत्सव होता. नकळत मनावर शहरी वातावरणाचं दडपण होतं. मुळातच धीट असल्यानं न घाबरता वावरले. आता नेमकं आठवत नाही, नयना प्रथम कधी भेटली ते. खरं तर, सूत जमण्यासारखं दोघींत काहीच साम्य नव्हतं. तरीही झकास जमलं.
नयना देखणी, स्टायलिश, केसाला विशिष्ट कट दिलेली. मी दाट केसांची. प्रसंगी दोन वेण्या घालणारी. तिचं बोलणं मधाळ, पाकातून काढल्यासारखं, मोरपीस फिरवल्यासारखं त्याच्या उलट माझा मोठा आवाज, मराठवाडी हेल. आता वाटतं, की या बाबी आमच्या कधीच आड आल्या नाहीत.
नयना चवीनं खाणारी. माझ्या आजोळीही नयनाचं येणं-जाणंही असे. तिच्या घरी कुटुंबियांना विशेषतः तिच्या भावाला आमची मैत्री आवडली होती. मी एनसीसी आणि मुलींच्या पहिल्या बॅचच्या हॉकी टीममध्ये खेळायचे. नयना लांबूनच पाहायची. हे क्षेत्र माझं नाही असं ती हसून सांगे.
मेच्या सुट्टीत गावी हिंगोलीला गेले होते. तिथं नवीनच कॉलेज सुरू होणार होतं. माझे वडील गावातील प्रतिष्ठित डॉक्टर असल्यानं मला त्या कॉलेजला घाला, तरच लोक मुलींना कॉलेजला पाठवतील, असं तिथल्या लोकांचं म्हणणं पडलं. वडिलांनाही ते पटलं. मला तिथं शिकावं लागलं. फर्स्ट इयरला मी, अजून एक मुलगी आणि ग्रामीण भागातली बारा मुलं असं पुण्याच्या कॉलेजच्या पुढं वेगळं वातावरण होतं. पुढं शांतीनिकेतन वातावरणात रमलेही. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी येई. नयनाची भेट ठरलेलीच. माझ्यातील हा बदल नयनाच्या नजेतून सुटला नाही. तिचं लग्न ठरलं तेव्हा भावी पतीला भेटायला घेऊन आली. पुढं माझंही लग्न झालं. मध्ये तीन वर्षं संपर्क कमी झाला आमचा.
तिच्या आणि माझ्या मैत्रीचे ऋणानुबंध घट्ट बांधले होते. नाशिक रोडला तिच्या नणंदेला आमच्यासमोर क्वार्टर मिळालं. परत भेटीचा सोहळा, संवाद सुरू झाला. माझ्या नंबर दोनच्या मुलांच्या बारशाला हजर राहून सुखद धक्का दिला. निरोपा-निरोपी, एकमेकींच्या बातम्या समजत होत्या. मधून-मधून भेटत होतोच.
आता तर सेवानिवृत्तीनंतर पुण्यात आल्यावर घर जवळच असल्यानं अधूनमधून भेटतोच. भेटलं, की तोच प्रेमाचा ओघ, तेच मैत्रीचे बंध, तेवढीच आपुलकी. फोन असतात; पण मला तिचं मधाळ बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. आमच्या गप्पा तर न संपणाऱ्या असतात. तिच्याकडे गेले, की काय खावं हा संभ्रम अशा सुगरतेनं केलेले पदार्थ असतात. तिच्याशी मैत्री हा आयुष्यातील सुखद आनंद आहे.
मराठवाड्यातल्या हिंगोलीसारख्या लहान गावातून मी पुण्यात शिकायला आले. एस. पी. कॉलेजला अॅडमिशन मिळवली. त्यावर्षी कॉलेजचा पन्नासावा महोत्सव होता. नकळत मनावर शहरी वातावरणाचं दडपण होतं. मुळातच धीट असल्यानं न घाबरता वावरले. आता नेमकं आठवत नाही, नयना प्रथम कधी भेटली ते. खरं तर, सूत जमण्यासारखं दोघींत काहीच साम्य नव्हतं. तरीही झकास जमलं.
नयना देखणी, स्टायलिश, केसाला विशिष्ट कट दिलेली. मी दाट केसांची. प्रसंगी दोन वेण्या घालणारी. तिचं बोलणं मधाळ, पाकातून काढल्यासारखं, मोरपीस फिरवल्यासारखं त्याच्या उलट माझा मोठा आवाज, मराठवाडी हेल. आता वाटतं, की या बाबी आमच्या कधीच आड आल्या नाहीत.
नयना चवीनं खाणारी. माझ्या आजोळीही नयनाचं येणं-जाणंही असे. तिच्या घरी कुटुंबियांना विशेषतः तिच्या भावाला आमची मैत्री आवडली होती. मी एनसीसी आणि मुलींच्या पहिल्या बॅचच्या हॉकी टीममध्ये खेळायचे. नयना लांबूनच पाहायची. हे क्षेत्र माझं नाही असं ती हसून सांगे.
मेच्या सुट्टीत गावी हिंगोलीला गेले होते. तिथं नवीनच कॉलेज सुरू होणार होतं. माझे वडील गावातील प्रतिष्ठित डॉक्टर असल्यानं मला त्या कॉलेजला घाला, तरच लोक मुलींना कॉलेजला पाठवतील, असं तिथल्या लोकांचं म्हणणं पडलं. वडिलांनाही ते पटलं. मला तिथं शिकावं लागलं. फर्स्ट इयरला मी, अजून एक मुलगी आणि ग्रामीण भागातली बारा मुलं असं पुण्याच्या कॉलेजच्या पुढं वेगळं वातावरण होतं. पुढं शांतीनिकेतन वातावरणात रमलेही. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी येई. नयनाची भेट ठरलेलीच. माझ्यातील हा बदल नयनाच्या नजेतून सुटला नाही. तिचं लग्न ठरलं तेव्हा भावी पतीला भेटायला घेऊन आली. पुढं माझंही लग्न झालं. मध्ये तीन वर्षं संपर्क कमी झाला आमचा.
तिच्या आणि माझ्या मैत्रीचे ऋणानुबंध घट्ट बांधले होते. नाशिक रोडला तिच्या नणंदेला आमच्यासमोर क्वार्टर मिळालं. परत भेटीचा सोहळा, संवाद सुरू झाला. माझ्या नंबर दोनच्या मुलांच्या बारशाला हजर राहून सुखद धक्का दिला. निरोपा-निरोपी, एकमेकींच्या बातम्या समजत होत्या. मधून-मधून भेटत होतोच.
आता तर सेवानिवृत्तीनंतर पुण्यात आल्यावर घर जवळच असल्यानं अधूनमधून भेटतोच. भेटलं, की तोच प्रेमाचा ओघ, तेच मैत्रीचे बंध, तेवढीच आपुलकी. फोन असतात; पण मला तिचं मधाळ बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. आमच्या गप्पा तर न संपणाऱ्या असतात. तिच्याकडे गेले, की काय खावं हा संभ्रम अशा सुगरतेनं केलेले पदार्थ असतात. तिच्याशी मैत्री हा आयुष्यातील सुखद आनंद आहे.