(फोटो सौजन्य :@pexels)
नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जागा नको
कोणत्याही नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला जागा देऊ नका. आज काल अनेक नाती तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होतात. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीसाठी नात्यांमध्ये बंधने तयार करा. नात्यातील कोणत्या गोष्टींमध्ये तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करायच्या आहेत हे आधीच ठरवा. तिसऱ्या व्यक्तीला जागा देऊ नका.
(वाचा :- ही आहेत फसवणूक करणाऱ्या जोडीदाराची लक्षणे, या मार्गांनी ओळखा तुमचा जोडीदार कसा आहे)
समजूतदारपणा
नात्यातील समजूतदारपणा म्हणजे आपण कधी बोलावे आणि कधी शांत राहावे याची जाण असणे. कधी हट्ट करावा आणि कधी गोष्टी सोडून देणे. यासाठी गौर गोपल दास यांनी एक मंत्र दिला आहे तो म्हणजे जेव्हा तुमच्या शांततेपेक्षा शब्द आधिक महत्त्वाचे वाटतील तेव्हाच संवाद साधा नाही तर शांत राहिलेले केव्हाही चांगले. तुमचा समजूतदारपणा तुमचे नाते अधीक घट्ट बनवेल.
(वाचा :- ब्रेकअपनंतरही एक्सची आठवणीने असह्य त्रास होतोय?, जाणून घ्या यातून वेदनेतून कसं बाहेर पडावं)
विश्वास हाच पाया
कोणत्याही नात्याचा विश्वास हाच पाया असतो. त्यामुळे तुमच्या नात्यात किती विश्वास आहे. या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. तुमचा जोडीदाराचा तुमच्यावर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यातील सर्वाच गोष्टी सिम्पल होतात. त्यामुळे नाते घट्ट करण्यासाठी प्रयत्न करा.
जोडीदारात दोष काढत बसू नका
जर तुम्ही कोणत्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट अशा सर्वाच गोष्टी स्विकारा. तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती नेहमीच तुमच्या मनाप्रमाणे वागेल असे होणार नाही. या जगात कोणीही परफेक्ट नाही आहे. त्यामुळे दुसऱ्याचे दोष काढत बसू नका. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कौतुकाचे शब्द
कधी कधी आपल्या मनातील गोष्टी तोंडावर येणं देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमचे एकमेकांवर असणारे प्रेम, कौतुकाचे शब्द, हे दुसऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करतात.त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तीचे कौतुक करा.
(वाचा :- माझी कहाणी : माझं यश माझ्या नात्यातील सर्वात मोठी अडचण झाली आहे, मला काहीच कळत नाही आहे)