>> दीपश्री आपटे, कॉलेज क्लब रिपोर्टर
muntainbox@gmail.com
सणासुदीच्या काळात खूप खरेदी केली जाते. यातूनच बऱ्याच प्रमाणात कचरा होतो. ओला, सुका कचरा वेगळा केला तरी घाईगडबडीत त्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही. निर्माल्य, प्लास्टिक, पेपर आणि धातूचं नीट वर्गीकरण केलं, तर त्याचा पुनर्वापर होऊन कचऱ्याची समस्या काही अंशी अटोक्यात आणता येऊ शकते. याच दिशेने एक पाऊल 'स्क्रेपॉन्स' या भांडुपच्या ग्रुपने उचललं आहे. प्रतीक जाधव, राहुल महानगरे, सागर जाधव, रोहित पवार आणि सुमित चव्हाण या तरूणांनी एकत्र येऊन 'युवर स्क्रॅप अवर बॅग' हा उपक्रम सुरू केला आहे. घरोघरी जाऊन ते या उपक्रमाची माहिती लोकांना देतायत.
ओळखीच्या किंवा आपल्या मित्र मंडळींकडे गणपती दर्शनाला गेलं की उपक्रमाच्या माहितीबरोबर ही मंडळी ‘स्क्रॅपबॅग' देतात. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेऊन, फक्त सुका कचरा त्यांना देण्याची विनंती ते करतात. भाजीपाला, देठं, निर्माल्य आदी विघटनशील गोष्टींपासून 'कंपोस्ट खत' बनवण्यात येणार आहे. हे खत बागेतल्या झाडांसाठी वापरण्यात येईल, अशी माहिती प्रतीक जाधवने दिली. 'कंपोस्ट खत' तयार करण्यासाठी सुधा माळोदे आणि त्यांच्या ‘स्वामिनी महिला गटा'ने विशेष मदत केली आहे. मेटल, प्लास्टिक आणि कागदाचा एका घरात तयार होणारा कचरा कमी असतो. पण हाच कचरा अनेक घरातून एकत्र केला तर मोठ्या प्रमाणात पुनर्वापरासाठी देता येईल. म्हणूनच मेटल, पेपर आणि प्लास्टीक याचं नीट वर्गीकरण करून तो कचराकुंडीत टाकण्याऐवजी कचरा वेचकांच्या हाती सुपूर्द करणार आहेत.
या उपक्रमाला आत्तापर्यंत २५ घरातून प्रतिसाद मिळाल्याचं प्रतिक सांगतो. ही मुलं आपल्या खिशातून याचा खर्च करतायत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर सोळा घरातून कचरा जमा झाला. तसंच या उपक्रमाबद्दल ऐकून भांडूपच्या 'संकल्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'नेही त्यांच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
muntainbox@gmail.com
सणासुदीच्या काळात खूप खरेदी केली जाते. यातूनच बऱ्याच प्रमाणात कचरा होतो. ओला, सुका कचरा वेगळा केला तरी घाईगडबडीत त्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही. निर्माल्य, प्लास्टिक, पेपर आणि धातूचं नीट वर्गीकरण केलं, तर त्याचा पुनर्वापर होऊन कचऱ्याची समस्या काही अंशी अटोक्यात आणता येऊ शकते. याच दिशेने एक पाऊल 'स्क्रेपॉन्स' या भांडुपच्या ग्रुपने उचललं आहे. प्रतीक जाधव, राहुल महानगरे, सागर जाधव, रोहित पवार आणि सुमित चव्हाण या तरूणांनी एकत्र येऊन 'युवर स्क्रॅप अवर बॅग' हा उपक्रम सुरू केला आहे. घरोघरी जाऊन ते या उपक्रमाची माहिती लोकांना देतायत.
ओळखीच्या किंवा आपल्या मित्र मंडळींकडे गणपती दर्शनाला गेलं की उपक्रमाच्या माहितीबरोबर ही मंडळी ‘स्क्रॅपबॅग' देतात. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेऊन, फक्त सुका कचरा त्यांना देण्याची विनंती ते करतात. भाजीपाला, देठं, निर्माल्य आदी विघटनशील गोष्टींपासून 'कंपोस्ट खत' बनवण्यात येणार आहे. हे खत बागेतल्या झाडांसाठी वापरण्यात येईल, अशी माहिती प्रतीक जाधवने दिली. 'कंपोस्ट खत' तयार करण्यासाठी सुधा माळोदे आणि त्यांच्या ‘स्वामिनी महिला गटा'ने विशेष मदत केली आहे. मेटल, प्लास्टिक आणि कागदाचा एका घरात तयार होणारा कचरा कमी असतो. पण हाच कचरा अनेक घरातून एकत्र केला तर मोठ्या प्रमाणात पुनर्वापरासाठी देता येईल. म्हणूनच मेटल, पेपर आणि प्लास्टीक याचं नीट वर्गीकरण करून तो कचराकुंडीत टाकण्याऐवजी कचरा वेचकांच्या हाती सुपूर्द करणार आहेत.
या उपक्रमाला आत्तापर्यंत २५ घरातून प्रतिसाद मिळाल्याचं प्रतिक सांगतो. ही मुलं आपल्या खिशातून याचा खर्च करतायत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर सोळा घरातून कचरा जमा झाला. तसंच या उपक्रमाबद्दल ऐकून भांडूपच्या 'संकल्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'नेही त्यांच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे.