परफेक्शन शोधू नका
या जगात कोणतीच गोष्टी परफेक्ट नाही आहे. त्यामुळे तुमच्या पार्टनमध्ये परफेक्शन शोधण्याचा प्रयत्न करु नका. एखादी गोष्ट दुरुन पाहणं आणि ती गोष्ट जगणं या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा पार्टनर खरा उतरेल हा विचार करु नका. ज्या प्रमाणे प्रत्येक टाळ्याची चावी वेगळी असते. त्याच प्रमाणे प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्यामुळे तुमच्या पार्टनरला समजण्याचा प्रयत्न करा.
जास्त अपेक्षा ठेवू नका
तुम्ही तुमच्या पार्टनर कडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जास्त अपेक्षा ठेवल्याने तुमचाच अपेक्ष भंग होऊ शकतो. तुम्ही दोघांनाही एकमेकांच्या चांगल्या सवयी, राहणीमान, आवडी-निवडी जाणून घेता आल्या पाहीजेत. अशा परिस्थितीत, तुम्हा दोघांना एकमेकांशी जुळवून घेण्यास मदत होईल. लग्नानंतर लगेच तुमच्या पार्टनरकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका. जास्त अपेक्षा ठेवल्याने तुमची निराशा होईल आणि नातेसंबंध खराब होतील. जास्त अपेक्षा ठेवल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो.
(वाचा :- आई व पत्नीच्या भांडणामध्ये काय करायचं? कोणाला निवडायचं या विचारात असाल तर हे पर्याय नक्की ट्राय करा)
जोडीदाराला समजून घ्या
तुमचा जोडीदार कोणत्या परिस्थितीतून जात आहे या गोष्टीचा विचार करा. प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे शांतपणे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेवून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत तुमची आर्थिक स्थिती, कामात व्यग्रता आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला किती वेळ देऊ शकता याबद्दल आपसात चर्चा करा. यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.
(वाचा :- Long Distance Relationship : लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्येही राहाल सदैव खुश, या 5 टिप्स करतील मदत..!)
कम्फर्ट झोनमध्ये राहू नका
मी असाच आहे आणि असाच राहणार असा अट्टाहास करु नका. यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. वेळे प्रमाणे स्वत:ला बदला. जोडीदार किंवा कुटुंबात संतुलन निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही करु शकता ते करा. त्या तुम्ही हे नाते टिकवण्यासाठी मेहनत घेत आहात ही गोष्ट तुमच्या पार्टनरच्या लक्षात येईल.
(वाचा :- टेक्स्ट मॅसेजवर का भांडू नये? हा वाद विकोपालाच जाणार; यामागची 5 कारण समजून घ्या)
प्राधान्यक्रम ठरवा
लग्नापूर्वी तुम्ही अविवाहित असताना तुमचे प्राधान्यक्रम वेगळे होते, पण लग्नानंतर तुमचे प्राधान्यक्रम बदलणे आवश्यक आहे. तुम्ही सुरू केलेल्या नवीन जीवनाला वेळ देणे हे तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असले पाहिजे. त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत घालवावा लागेल. पण या दिवसात केलेल्या गोष्टी तुम्ही कायम कराल याची काळजी घ्या. त्याच प्रमाणे तुमच्या पार्टनरसोबतच परिवाराला आणि मित्रमैत्रीनींनासुद्धा वेळ द्या.
(वाचा :- चुकुनही गर्लफ्रेंडला या ५ गोष्टी सांगू नका, नाहीतर ब्रेकअप झालंच म्हणून समजा)