एका मुलाखती मध्ये माधुरीने सांगितले की तिच्यासाठी हा बदल खूप मोठा होता. अचानक संसारची जबाबदारी आणि ती देखील दुसऱ्या देशात ही तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. याबद्दलचा अनुभव तिने शेअर केला ज्याच्याशी कोणतीही सामान्य मुलगी सुद्धा रिलेट करेल. (सर्व फोटो: फेसबुक @madhuridixitnene, istock by getty images)
कसे होते अमेरिकेतले आयुष्य?
माधुरीने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, दुसऱ्या देशात जाऊन राहणे ही गोष्ट वाटते तितकी सोप्पी नाही. जेव्हा तुम्ही लग्न करून जाता तेव्हा तर ही गोष्ट अजिबातच सोप्पी नसते. इकडे माझ्या सोबत भारतात सतत कोणी ना कोणी असायचं. मी शुटींगला असले तरी माझ्या सोबत घरातलं कोणी ना कोणी असायचं यामुळे मला खूप सुरक्षित वाटायचं! मात्र आता मला तिथे स्वत:च्या गोष्टी स्वत: करणे, अनेक निर्णय स्वत:च घेणे यांसारख्या गोष्टी करावी लागल्या. पण यामुळे ती स्वावलंबी झाली याचा तिला अभिमान वाटतो असेही ती म्हणाली.
(वाचा :- कधीकाळी उस्ताद झाकीर हुसैन यांच्याकडे प्रवासासाठी खिशात नव्हता एक रूपया, मग पुढे…!)
खूप शिकायला मिळालं
लग्नानंतर काहीच काळात मुलं सुद्धा पदरात पडली तेव्हा माधुरी वरच्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या. पण न डगमगता सगळ्या गोष्टी तिने शिकून घेतल्या. कधी कधी मदतीला आई किंवा सासूबाई यायच्या. पण अधिकाधिक तिनेच स्वत:च मुलांची काळजी घेतली आणि आई म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. माधुरी म्हणते की अशा एकट्याच्या अंगावर जेव्हा जबाबदाऱ्या येतात तेव्हाआपल्यातला अल्लडपणा आणि बेजबाबदारपणा निघून जातो आणि आपण स्वत:हून जबाबदारी घ्यायला शिकतो.
सामान्य तरुणींना सुद्धा हाच येतो अनुभव
माधुरी असो की अन्य कोणी सामान्य तरुणी लग्नानंतर आयुष्य खूप बदलतं. अनेक गोष्टी बदलतात. माधुरीने शेअर केलेला अनुभव तिचा एकटीचाच नाही तर असंख्य स्त्रियांचा आहे. अशावेळी त्या गोष्टींशी जुळवून घेऊन जगण्यास थोडा वेळ लागतो. पण एकदा जुळवून घेता आलं की सगळं सोप्पं वाटतं. सतत सोबत असणारे आई वडील भाऊ वा बहिण सासरी सोबत नसतात. पण ते सोबत नसता धीर एकवटून मुली सासरची जबाबदारी घेतात आणि आपल्या संसाराला नव्याने सुरुवात करतात. यासाठी प्रत्येक मुलीचे कौतुक करायला हवे. आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणे वाटते तितके सोप्पे नक्कीच नाही.
हा काळ आव्हानात्मक असतो
अनेक स्त्रियांसाठी हा काळ आव्हानात्मक सुद्धा ठरू शकतो. अनेकदा आपण अनेक अपेक्षा घेऊन सासरी जातो पण त्या अपेक्षा पूर्ण होत नसतील अशावेळी मनापासून तिथे राहता येत नाही. सतत वागण्यातून बोलण्यातून नाराजी दिसून येते. यामुळे सासरचे लोक सुद्धा नाराज होण्याची शक्यता असते. शिवाय ती देखील नवख्या वातावरणात रूळण्याचा प्रयत्न करत असते आणि दुसरीकडे सासरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं दडपणही तिच्यावर असतंच.अशावेळी तरुणींनी स्वत:वर कंट्रोल ठेवून शक्य तितकं परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवं. जर त्रास होत असेल तर तो शेअर करायला हवं. एकटीने दडपण घेतलं तर त्याचा त्रास हा होणारच!
(वाचा :- माझी कहाणी :- मी माझ्या बॉसच्या बायकोसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि मग पुढे…!)
मुलींना स्वावलंबी बनवा
यासाठी पालकांनी आपल्या मुलींना लहानपणापासूनच स्वावलंबी होण्याचे धडे द्यायला हवेत. अनेकदा आपण मुलींची तक्रार असते की मला काम करताना सासरी त्रास होतो, मला जमत नाही. पण जर आधीपासूनच तिला जबाबदारी घेण्याची सवय असेल व तिला त्यासाठी तयार केले असेल तर ती सहज आपले कर्तव्य पार पडू शकते. केवळ संसार सांभाळण्याच्या हिशोबाने नाही तर मुलगी दुसरीकडे कुठे राहायला गेली तर ती एकटी स्वत:ची स्वत: काळजी घेऊ शकते यासाठी मुलींना लहानपणापासूनच स्वावलंबी बनवण्याची गरज आहे!