पण खरी समस्या मुलीकडच्या लोकांची आहे. तिच्या घरच्यांना हे लग्न आणि आमचे नाते मान्य नाही. जेव्हा तिने घरी याबद्दल सांगितले तेव्हापासून तिच्या घरच्यांनी तिच्याशी बोलणे सोडले आहे. हे लग्न करू नये म्हणून तिच्यावर ते दबाव टाकत आहेत. त्यांना कसे समजवावे हे आम्हाला देखील कळत नाही आहे. आई वडिलांची समंती नसल्याने माझ्या गर्लफ्रेंडने देखील सगळ्याचा स्ट्रेस घेतला आहे. आम्ही नक्की काय करावे? (सर्व फोटो सांकेतिक आहेत. आम्ही युजर्सनी शेअर केलेल्या कहाणीमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवतो)
जाणकारांचे उत्तर
फोर्टीस हेल्थकेअर मधील मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर कामना छीब्बर यांनी या प्रश्नावर उत्तर देताना असे म्हटले की, “सध्या अनेक कपल्सच्या आयुष्यात अशी स्थिती निर्माण होते आणि याला केवळ आणि केवळ आपल्या समाजाची बुरसटलेली मानसिकता जबाबदार आहे जी आजही जात वगैरे मानते. माझ्या मते तुम्ही एकदा तिचा आई वडिलांशी नित शांतपणे बोलून पाहण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास जवळच्या काही व्यक्तींना सोबत घेऊन जावे, जे त्या दोघांना समजावू शकतात. शक्य तितक्या पद्धतीने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा. कारण त्यांची समंती या लग्नासाठी महत्त्वाची आहेच.”
जर ते तयारच होणार नसतील तर
डॉक्टर कामना छीब्बर यांनी आपली प्रतिक्रिया सुरु ठेवताना पुढे म्हटले की, “जर खूप प्रयत्न करून देखील तिचे आई वडील तयार होत नसतील आणि तुमच्या गर्लफ्रेंडला देखील आपल्या आई वडिलांना दुखवायचे नसेल, ती मनापासून तिच्या आई वडिलांपासून दूर जाऊन तुमच्या सोबत खुश राहणार नसले तर तुम्ही दोघांनी वेगळे झालेले उत्तम! जर तुमची गर्लफ्रेंड स्वत:हून आई वडिलांचा विचार बाजूला सारून तुमच्या सोबत येण्यास तयार असेल आणि संसारात खुश राहणार असेल तरच लग्नाचा निर्णय घ्यावा. शक्य असल्यास तुम्हाला जे ओळखतात वा ज्यांनी तुमचे रिलेशनशिप जवळून पाहिले आहे त्यांचा देखील याबाबतीत एकदा सल्ला घ्यावा.”
(वाचा :- सावधान, जोडीदारातील ‘हे’ 5 बदल करतात रेड अलर्टचा इशारा, वेळीच सावरा नाहीतर आयुष्य होईल उद्धवस्त..!)
जाती धर्माची समस्या
आपला देश भले आज पुरोगामी म्हणून ओळखला जात असले पण नक्की स्थिती काय आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. आजही या एकविसाव्या शतकात आपल्या देशामध्ये ऑनर किलिंग सारख्या घटना घडतात. दुसऱ्या जातीच्या वा धर्माच्या जोडीदाराशी लग्न केल्याने आमचे नाक कापले गेले, आमचा मान उरला नाही, असे कारण देऊन थेट निष्पाप युगुलांचे जीव घेतले जातात. अगदी सुशिक्षित लोकं सुद्धा यात मागे नाहीत. दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, ते आयुष्यभर सुखी राहतील या गोष्टीकडे सरार्स कानाडोळा करून जी धर्माच्या भिंती मध्ये आणल्या जातात हे दुर्दैवी आहे.
मानसिकदृष्ट्या खंबीर व्हा
जर आंतरजातय विवाहाचा निर्णय तुमच्या जीवावर बेतणार असेल वा तुमचे कुटुंब त्यामुळे धोक्यात येणार असेल तर अशा वेळी शांत डोक्याने निर्णय घेणे उत्तम आहे. उगाच भावनेच्या भारत वाहत जुं लग्नाचा निर्णय घेऊ नये. जमल्यास दोघांनी मिळून विचार करून वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा. अगदीच ओढ असेल आणि वेगळे राहणे शक्य नसेल तर पुढे जे काही धोके निर्माण होतील त्या पासून संरक्षक म्हणून काही महत्त्वाची पाउले आधीच उचलावीत. एकंदर भविष्याचा विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा.
मानसिकता बदलण्याची गरज
ही स्थिती तेव्हाच बदलेले जेव्हा समाजाची मानसिकता बदलेले. जाती धर्म या दोन अत्यंत विखारी गोष्टी असून यामुळे कधीच कोणाचे भले झालेले नाही. ही गोष्ट जोवर प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजणार नाही तोवर आंतरजातीय विवाह कोणीच मान्य करणार नाही. अगदी शाळेपासून याची सुरुवात व्हायला हवी, जेणेकरून येणारी पिढी तरी सुखी राहील आणि अशा गोष्टींना बळी पडणार नाही.