आमचे आयुष्य सुरळीत सुरू होते, पण जेव्हा मी ३० वर्षांचे झाले तेव्हा गोष्टी बदलू लागल्या. आपण घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, असे मला वाटू लागले. आपल्या जीवनात रंग भरण्यासाठी मूल देखील असणं गरजेचं आहे. पण माझ्या पतीला यामुळे फरक पडत नव्हता. जेव्हा जेव्हा मला कुटुंबातील किंवा मित्र-मैत्रिणींपैकी कोणीही याबाबत प्रश्न विचारतात की तुम्हा दोघांना बाळ कधी होणार? तेव्हा मी खूप अस्वस्थ व्हायचे.
लग्नाला पाच वर्षे उलटल्यानंतरही मुलांबद्दल माझ्या पतीच्या विचारात अजिबात बदल झालेला नाही. या विषयावर मी जेव्हा त्यांच्याशी बोलते तेव्हा ते याकडे दुर्लक्ष करतात. याबद्दल काहीही बोलल्यास त्यांना माझा राग येतो. याचं कारण म्हणजे लग्नाआधीच त्यांनी स्पष्टपणे त्यांचं मत मला सांगितलं होतं. माझी स्थिती अशी आहे की त्यांनी माझ्यापासून अंतर वाढवण्यास सुरुवात केलीय. मला समजत नाही की मी त्यांना माझी समस्या कशी समजावून सांगू?
(फोटो सौजन्य- Istock)
(पुरुषांना या सवयी असणाऱ्या महिलांशी मुळीच लग्न करण्याची नसते इच्छा)
तज्ज्ञांचे उत्तर
डॉ.केदार तिळवे यांचं उत्तर - तुमच्या आयुष्यात मूल होणं किंवा नसणं हा पूर्णपणे तुम्हा दोघांचा वैयक्तिक निर्णय आहे. हे तुमच्या भूतकाळातील अनुभवावर अवलंबून आहे. पण जेव्हा नाती बहरू लागतात तेव्हा लोकांच्या वागण्यात आणि भावनांमध्येही फरक पडतो. हे देखील एक कारण आहे की बरेचदा लोक त्यांचे जुने निर्णय बदलतात आणि नवीन मार्गाने त्यांचे जीवन सुरू करतात.
मी तुमची समस्या समजू शकते. पण तुमचा पती अजूनही त्याच्या जुन्या विचारांवर ठाम आहे. अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुमच्या पतीला मुलांचा इतका त्रास का होतो? त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणारा भूतकाळातील काही अनुभव आहे का?
(पुरुषांना या सवयी असणाऱ्या महिलांशी मुळीच लग्न करण्याची नसते इच्छा)
पतीला समजून घेण्याचा प्रयत्न करा
तुमच्या पतीने घेतलेल्या या निर्णयामागचे कारण तुम्हाला खरेच जाणून घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम या विषयावर रागावण्याऐवजी त्याच्याशी प्रेमाने बोला. त्यांच्याकडून मूल न होऊ देण्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करा. हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्यांना मुलाच्या नावाचा इतका त्रास का आहे?
एवढेच नाही तर त्यांचा विश्वास जिंकण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. त्यांना कळू द्या की परिस्थिती कोणतीही असो, तुम्ही नेहमीच त्यांच्यासोबत आहात. पती-पत्नीचे नाते फार नाजूक असते. दोघांमध्ये कितीही प्रेम असलं तरी एखाद्या मुद्यावर वेगवेगळी मतं असली की ते भांडणाचं कारण बनतं.
(माझी कहाणी: पुरुष त्या महिलेशी लग्न करत नाहीत, जिच्यावर त्यांचं प्रेम असते; तर…)
विवाह समुपदेशकाची मदत घ्या
तुम्हाला पतीचे मत बदलण्याव्यतिरिक्त त्यांच्याशी मनमोकळेपणाने संभाषणही करण्याची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर हवे असल्यास आपण या विषयावर विवाह समुपदेशकाचीही मदत घेऊ शकता. समुपदेशकाने विचारलेले प्रश्न आणि संभाषण यामुळे तुमच्या पतीची भावना बदलू शकते. ते आपला निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतील. कदाचित त्यांना मुलांचे महत्त्व कळेल. संपुष्टात येणारे नाते वाचवण्यासाठी समुपदेशनाची मदत घेणे वाईट नाही हे त्यांना कळू द्या. अशा प्रकारचे समुपदेशन अनेकदा नाते टिकवण्यास मदत करते.
(हॉट लुक नव्हे तर महिलांच्या 'या' सवयी पुरुषांना करतात अधिक आकर्षित)
(इंग्रजी भाषेमध्ये हा लेख वाचण्याकरीता येथे क्लिक करा)