(सर्व फाइल फोटो - सर्व फोटो प्रतीकात्मक आहेत, आम्ही वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या कथांमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवतो)
तज्ञांचे उत्तर
ऑन्टोलॉजिस्ट आणि रिलेशनशिप एक्सपर्ट अश्मीन मुंजाल सांगतात की कोणत्याही नात्यामध्ये असुरक्षिततेची भावना असते. मग ते नाते सासू-सासरे असोत, वहिनी असोत किंवा पत्नी असोत ही भावना नात्यांना लांब करते. कारण ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्याला गमावण्याची भीती आपल्या मनात सतत असते. ज्या आईने खरंच आपल्या मुलासाठी संपूर्ण आयुष्य वेचले आहे, त्यांच्यासाठी आयुष्यभर खूप काही केलेल असते अशी मुलं लग्नानंतर तिच्या पासून लांब होतील की काय या भावनेने त्यांना असुरक्षित वाटण्याते. ही एक अतिशय सामान्य भावना आहे. त्यात काही चुकीच काहीच नाही.
स्वतःला त्यांच्या जागी ठेवा पाहा
तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हाला असे वाटते की तुमची सासू तुम्हाला तुमच्या पतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, सर्वात आधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवा, तरच तुम्ही त्यांना समजून घेऊ शकाल. एवढेच नाही तुमच्या येण्याने त्याच्या आयुष्यात काही बदलले आहे का या गोष्टींची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना समजण्याचा प्रयत्न करा. त्यांना कोणत्या गोष्टींबद्दल असुरक्षित वाटत आहे ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या सर्वमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला त्याच्या मिळून मिसळून राहायचे आहे.
पतीला तुमच्या भावना सांगा
तुम्हाला होणारा त्रास समजू शकतो अशा वेळी तुम्ही तुमच्या लग्नावर लक्ष केंद्रित करण्यास असा सल्ला मी तुम्हाला देईन. पण तरीही मी म्हणेन यती तुझ्या सासूशी एकदा बोल. त्यांना फक्त गोष्टी सांगा, नकळतपणे त्या तुम्हाला तुमच्या पतीपासून दूर करत आहेत. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या पतीशी याबाबत बोलू शकता. त्यांना सांगा की या गोष्टी तुम्हाला किती अस्वस्थ करतात. कदाचित तुमचा पती तुम्हाला या गोष्टीमध्ये मदत करु शकेल.