मुलांचा ग्रुप असो किंवा मैत्रिणींचा, ते अजूनही आमच्या खासगी गोष्टींबाबत त्या-त्या ग्रुपमध्ये चर्चा करतात. आता त्यांच्या या सवयींमुळे मी त्रासलेय. वारंवार याबाबत चर्चा करूनही त्यांनी ही घाणेरडी सवय बदलेली नाही. या समस्येवर काही उपाय आहे का? (सर्व सांकेतिक फोटो: इंडियाटाइम्स)
वेळेनुसार जोडीदाराचं खरं रूप येते समोर
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ रचना अवतरमानी यांचं उत्तर : विवाह हा एक असा अनुभव आहे, ज्यामध्ये दोन लोक आयुष्यभर पार्टनर म्हणून कायम एकत्रित राहतात. सहसा या नात्याच्या सुरूवातीस प्रत्येक जोडप्याला आनंदी आणि उत्साही वाटते. आपल्या नात्यात जे काही आहे ते खूप चांगलं आहे, असा त्यांना विश्वास असतो. यामुळे एकमेकांमधील फरकाकडे ते बारकाईनं लक्ष देत नाहीत.
(माझी कहाणी: लठ्ठपणाच्या समस्येमुळे हैराण झाले होते, पण सासऱ्यांमुळे माझा दृष्टीकोनच बदलला)
पण जसजसा वेळ निघून जातो, तसतसे ते एकमेकांना अधिकाधिक समजून घेऊ लागतात आणि नंतर त्यांना जोडीदाराचे वागणे, सवयी व व्यक्तिमत्त्वाचे वास्तव पाहायला मिळते. यापैकी एक गोष्ट म्हणजे जोडीदाराचे त्याच्या कुटुंबीयांशी व मित्रमैत्रिणींसोबतचे नाते, जे लग्नानंतर काही दिवसांनीच समजते.
एकत्रित मिळून काम करा आणि मार्ग शोधा
मी समजू शकते की तुमचा पती ज्या प्रकारे वैयक्तिक आणि लैंगिक जीवनाची माहिती मित्रांसमोर उघड करत आहे, त्यामुळे आपण फार अस्वस्थ झाल्या आहात. त्यांच्याशी चर्चा करूनही कोणताही मार्ग सापडत नाहीय. अशा परिस्थितीत मी सुचवेन की तुम्ही त्यांना तुमच्याकडून आणि या नात्याकडून काय हवे आहे ते थेट विचारा. तुमच्या अपेक्षांबद्दल त्यांना नंतर सांगा.
(माझी कहाणी : मी माझ्या प्राध्यापकांच्या प्रेमात आहे, त्यांच्यात व माझ्यात २९ वर्षांचे आहे अंतर)
या समस्येवर आपण एकत्रित काम केलं पाहिजे आणि काही मूलभूत नियमही तयार केले पाहिजेत. आपण एखाद्याला त्यांच्या वागणुकीच्या आधारावर बालिश म्हणू शकत नाही, कारण त्यांना वाटेल की अशा प्रकारची माहिती त्यांच्या मित्रांसह सामायिक करणे सामान्य आहे.
संगोपनामधील फरक
प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे की लग्न झालेल्या दोन लोकांची पार्श्वभूमी वेगवेगळी असते आणि त्यांचं संगोपनही वेगळ्या पद्धतीने झालेलं असते. यामुळे तुम्ही दोघेही एकमेकांशी बोलून मधला मार्ग शोधू शकता. आपण असेही नमूद केलंय की त्यांनी तुम्हाला फटकारलेय आणि त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करण्यासह सांगितलंय.
तुम्हाला त्यांना सांगावे लागेल की ही बाब तुम्हा दोघांच्याही आयुष्याशी निगडीत आहे आणि त्यासाठी तुम्ही दोघेही तितकेच जबाबदार आहात. त्यामुळे तुम्हाला या समस्येवर तोडगा मिळवण्याकरीता काम करावेच लागेल. पतीला तुमच्याकडून आणि तुम्हाला त्यांच्याकडून काही गोष्टी अपेक्षित असू शकतात. जर या समस्यांवर आपण एकत्रित येऊन काम केलं तर नक्कीच तुम्हाला उपाय मिळू शकतो.
(इंग्रजी भाषेमध्ये हा लेख वाचण्याकरीता येथे क्लिक करा)