आपल्याला लग्नानंतरचा संसार कितपत झेपेल याबद्दल ती खूप साशंक होती. जुन्या अनेक मुलाखतीमध्ये तिने या गोष्टी उघडपणे कबूल केल्या होत्या. पण म्हणतात ना प्रेम हे खास असतं आणि ते तुमच्या विचारांत सुद्धा वेगळेपण घेऊन येतं असंच काहीसं अनुष्काचं विराटला भेटल्यानंतर झालं आणि कधी काळी ज्या अनुष्काला लग्नाचा तिटकारा होता ती अगदी यशस्वीपणे विराटशी संसार करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, का मुली असा विचार करतात? अशा काय गोष्टी असतात ज्यामुळे मुलींना लग्न करायला आवडत नाही. चला जाणून घेऊया.
बदलते विचार
पूर्वी मुलींची लग्न लवकर व्हायची पण आता ते विचार मागे पडले असून मुलीने शिकावं आणि आपलं करियर घडवून, स्वत:च्या पायावर उभं राहावं अशी आई वडिलांची सुद्धा इच्छा साते. साहजिकच लग्नाचा कोणताही दबाव नसतो. त्यामुळे मुलींना या वयात लग्नाची गोष्ट विचारल्यास त्या साहजिकच त्या गोष्टीला नकार देतात. पण जेव्हा आयुष्यात कोणी चांगला तरुण येतो आणि त्याच्या सोबत आपण आयुष्य काढू शकतो आपलं करियर सुद्धा आता मार्गावर आहे याची जाणीव झाली कि मात्र त्या स्वत:हून लग्नासाठी तयार होतात.
(वाचा :- होणारं सासर किती सुरक्षित आहे हे प्रत्येक मुलीने तपासायला हवे, का केलं मीरा राजपूतने असं वक्तव्य?)
शिक्षण आणि स्वप्न
सध्याच्या युगातील मुली खूप स्वतंत्र विचारांच्या आहेत. स्त्रीने आता लग्न करून चूल आणि मुल यांच्यात अडकून पडण्याचा काळ मागे पडलाय. मुलींना संसारापेक्षा आपली स्वप्न आणि शिक्षण पूर्ण करण्यात जास्त रस असतो. त्यांना कोणावरही ओझं व्हायचं नसतं. आयुष्यभर संसार सांभाळत जगायचं नसतं. आसपासचं युग सुद्धा याच विचारांचे असल्याने त्यांची विचारधाराही तशीच कायम राहते आणि शिक्षण व स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय लग्न नको असा अट्टाहास मुली धरतात.
(वाचा :- “मी कुमारी माता म्हणून जगेन पण लग्न नको”, का करतात स्त्रिया टोकाचा विचार?)
लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या
आता मुलींना कुटुंबात हीन वागणूक मिळणे बंद झाले आहे खास करून शहरात आणि सुशिक्षित घरात वाढणाऱ्या मुलींना! आई वडील सुद्धा त्यांना अगदी सुखात ठेवतात. कसली चिंता नसते, ऐशोआरामात आयुष्य सुरु असते. अशावेळी लग्न करून तिथे सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलणे आपल्याला जमेल का हा प्रश्न त्यांना सतावत असतो. तिथे सतत लक्ष द्यायला आई वडील नसतात. त्यामुळे या जबाबदाऱ्यांना घाबरून सुद्धा अनेक मुली लग्नापासून दूर पाळतात. अशावेळी त्यांना साथ देणारा जोडीदार मिळाला तर मात्र त्यांचे हे विचार बदलायला वेळ लागत नाही.
(वाचा :- अमिताभ बच्च्चन यांची मुलगी आहे त्यांच्यासाठी खूप चिंतेत, बाप लेकीचं नातं का असतं इतकं घट्ट?)
करियर होणार नाही
अनेक मुलींना भीती असते की लग्नानंतर सासरची लोकं आपलं कामाला जाणं बंद करायला लावतील आणि यामुळे करियरवर पाणी सोडावे लागेल. त्यांचा हा विचार खरा सुद्धा आहे कारण अनेक घरात सुनेने कामाला जाण्यावर आक्षेप असतो जो की चुकीचा आहे. अशा घटना सध्या वाढत सुद्धा आहेत. त्यामुळे जे करियर सुरु आहे किंवा जे करियर पूर्ण करायचे आहे ते लग्न केलं तर कधीच पूर्ण होणार नाही हि भीती मुलींना असते. बहुतांश मुली याच गोष्टीमुळे लग्नाचा विचार करणे टाळतात.
(वाचा :- विवाहित व्यक्तीसोबत लग्न करताना काय काळजी घ्यावी? करीनाचाही होता सैफसोबत लग्नाला विरोध!)
अरेंज मॅरेजला विरोध
बहुसंख्य मुलींना अरेंज मॅरेज नको असते. त्यांना स्वत:हून आपल्याला हवा तो जोडीदार शोधायचा असतो. घरातल्यांनी स्वत: पाहिलेल्या मुलावर त्यांचा मुळात विश्वास नसतो कारण मुलींना अशा मुलांबद्दल जास्त माहिती नसते आणि आपल्याकडे लग्न अशी गोष्ट आहे जी एकदा केली की त्यातून बाहेर पडणे हे कठीण आहे. त्यामुळे साहजिक मुलींचा कल स्वत:चा जोडीदार स्वत: शोधण्याकडे असतो आणि त्या नेहमी त्या शोधात असतात. जोवर तो मिळत नाही तोवर लग्न नकोच यावर त्या अगदी ठाम असतात.
(वाचा :- हरियाली तीज या सणाला हिंदू धर्मात व मुलींच्या आयुष्यात का आहे महत्त्वाचे स्थान?)