अ‍ॅपशहर

Relationship Tip : हे ५ संकेत सांगतात की संपत आलंय तुमच नातं, आजच सावध व्हा

Relation Tips : जेव्हा दोन व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकीची भावना निर्माण होते. त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो. पण कधी कधी नात्यात दुरावा निर्माण होतो. तुम्हाला ही तुमच्या नात्याची काळजी वाटत असेल तर हे ५ संकेत तुम्हाला सांगतील की तुमचे नाते संपत आले आहे.

Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jul 2022, 5:06 pm
Relation Tips : जेव्हा दोन व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकीची भावना निर्माण होते. त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो. पण कधी कधी नात्यात दुरावा निर्माण होतो. अनेकवेळा जोडप्यांमध्ये वेळोवेळी खूप भांडणे होतात, काहीवेळा जोडपे बरेच दिवस एकमेकांशी बोलत नाहीत. त्यांच्यातील प्रेम कमी होऊ लागते किंवा ते नाते तुटण्याच्या मार्गावर येते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम relationship tips for how you can save your relationship
Relationship Tip : हे ५ संकेत सांगतात की संपत आलंय तुमच नातं, आजच सावध व्हा


तुम्हाला ही तुमच्या नात्याची काळजी वाटत असेल तर हे ५ संकेत तुम्हाला सांगतील की तुमचे नाते सांगत आले आहे. या ५ गोष्टी जर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये जाणवत असतील तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. नाहीतर तुमचे नाते तुटू देखील शकते.

(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

​जेव्हा गैरसमज निर्माण होतो

जेव्हा दोघांमध्ये गैरसमज वाढू लागतात आणि बोलून हे गैरसमज दूर करू शकत नाहीत, तेव्हा नातेसंबंध बिघडू लागले आहेत असे तुम्ही समजू शकतो. काही वेळा जोडप्यांमध्ये तणाव निर्माण होतो पण ते एकमेकांशी बोलून समस्या सोडवतात. यामुळे त्यांच्यातील नाते अधिक घट्ट होते. त्यामुळे तुमचे नाते पक्के करण्यासाठी प्रयत्न करा.

(वाचा :- मुली काय विचार करून लग्न करतात? तुम्हाला ही हा प्रश्न पडलाय मग हे वाचाच)

​जोडीदार जेव्हा काळजी घेणे थंबावतो

जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा ते एकमेकांची काळजी घेतात. ते एकमेकांच्या आवडीनिवडी, त्यांचे आरोग्य, सुरक्षितता इत्यादींची काळजी घेतात. मात्र, जेव्हा पार्टनर तुमची काळजी घेणे थांबवतो, तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करू लागतो, तेव्हा समजले पाहिजे तुमचे नाते धोक्यामध्ये आले आहे.

(वाचा :- प्रेग्नेंट सूनबाई आलिया भट्टने सासूबाई नीतू कपूरवर लिहिलेली ही पोस्ट व्हायरल, वाचून लागेल 440 व्होल्टचा झटका..!)

​कमी भावनिक असणे

जोडीदारीचा तुमच्यातील भावनिकपणा जेव्हा कमी होतात तेव्हा तुमच्यातील नाते कमकुवत झालेले असते. कोणत्याही नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपुलकी . पण जेव्हा नात्यात भावनिक जोड कमी होऊ लागते, तेव्हा समजले पाहिजे की नाते कमकुवत झाले आहे.

(वाचा :- माझी कहाणी : साखरपुडा झाल्यानंतर होणारा नवरा मोडतो आहे लग्न, कारण त्याला माझ्या शरीरात दिसू लागलीये ‘ही’ कमी..!)

​प्रेम दर्शवणं सोडून देणं

कधी कधी जोडीदार कामात खूप व्यस्त असतात. पण अशा स्थितीत त्याच्यात तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करणं सोडून दिले तर तुमचे नाते तुटू शकते. त्यामुळे असे होणार नाही याची काळजी घ्या.

(वाचा :- Tina Ambani's Emotional Post: टीना अंबानी सासरे धीरुभाईंसाठी बोलल्या असे काही, वाचून तुम्हीही भोवया उंचावाल)

लेखकाबद्दल
मृणाल पाटील
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा

महत्वाचे लेख