(लग्नानंतर अफेअर केल्यास वैवाहिक जीवनावर कसा होतो परिणाम? पाच महिलांनी सांगितली त्यांची कहाणी)
जर आपण खोटे बोलणार्या, अयोग्य व्यक्तीसोबत नातेसंबंधात असाल तर त्यांच्या वर्तनाद्वारे तुम्हाला असे संकेत मिळतील की ज्याची आपण कधीही कल्पना केली नसेल. तुमचा पार्टनर प्रामाणिक आहे की नाही? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती… (सर्व सांकेतिक फोटो: istock by getty images)
(मॅचदरम्यानच भारतीय क्रिकेटरसमोर आलं पत्नीचं अफेअर, पण धक्का पचवून खेळाडूनं केलं होतं दमदार कमबॅक)
सत्य तपासून घ्या
काही लोकांना सतत खोटे बोलण्याची सवय असते. ही मंडळी आपल्या जोडीदाराचीही फसवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि इतक्या आत्मविश्वासाने खोटे बोलतात की तुम्हाला ते कळतही नाही. तुमचा जोडीदार तुम्हाला जे काही सांगत आहे, ते खरे आहे की खोटे? हे जाणून घेण्याकरीता त्याच मुद्यावर पुन्हा कधी तरी अचानक संवाद साधा, जेव्हा त्यांना ही बाब अपेक्षित नसेल. जर तो/ती संकोच करत असेल किंवा त्यांचे शब्द व हावभाव जुळत नसतील किंवा आताची माहिती पूर्वीच्या माहितीशी जुळत नसेल तर समजून जा की त्यांनी तुम्हाला सत्य सांगितले नाही.
(प्रियंका-निकनं १४४ कोटी रूपयांच्या घरात लावलीय या खास क्षणाची फोटोफ्रेम, सप्तपदीचं आहे खूप महत्त्व)
संकोत व्यक्त करणे
जोडीदार तुम्हाला जे काही सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की तो एखाद्या गोष्टीबद्दल खरे सांगत नाही, तर त्यानं/तिनं सांगितलेली प्रत्येक माहिती लक्षात ठेवा. उदाहरणार्थ जर त्यानं/तिनं एखाद्या मित्राचा किंवा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख केला तर काही दिवसांनी त्यांचा पुन्हा उल्लेख करा. यादरम्यान जोडीदार अस्वस्थ झाला किंवा त्याच मुद्याबद्दल पुन्हा संवाद साधण्यास तो/ती संकोच व्यक्त करत असेल तर काहीतरी चुकीचे घडत आहे, हे लक्षात घ्या.
(ईशा-करीनाच्या खास मैत्रीत या चुकीमुळे पडला मिठाचा खडा, असा हस्तक्षेप कोणालाही नाही आवडणार)
गोष्टी लपवणे
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा गुप्तता बाळगणे किंवा एकमेकांपासून गोष्टी लपवणे अजिबात योग्य नाही. थोडीशी प्रायव्हसी असणं आवश्यक आहे, पण यादरम्यान नात्यातील संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. जर कोणी आपले मित्र, नोकरी, कुटुंब आणि जीवनाशी संबंधित इतर गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोलत नसेल तर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे.
(मित्रांच्या या पैजेमुळे शिल्पा शेट्टीची प्रेमात झाली फसवणूक, अशा मैत्रीत होते फक्त नुकसान)
सतत कारणे देणे
एखाद्या गोष्टीबद्दल एकदा किंवा दोनदा कारणे सांगणे ठीक आहे, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी कारणे शोधून काढणे योग्य नाही. पण खोट बोलणाऱ्या माणसांना सतत काही-न्-काही कारणे देण्याची सवयच असते. याबद्दल त्यांना वाईटही वाटत नाही. मुद्दा काहीही असला तरीही ही मंडळी स्वतःवर दोष येऊ नये याकरीता काहीतरी बहाणे-थापा मारणारच. हे लोक केलेल्या कृतीची जबाबदारीही घेणार नाहीत किंवा भविष्यात होणाऱ्या परिणामांचाही त्यांच्यावर फरक पडत नाही. कारण या नात्यामध्ये ते भावनिकरित्या गुंतलेलेच नसतात.
(बच्चन कुटुंबीयांच्या घरात यंदाच्या दिवाळीत पसरली शांतता, या कारणामुळे अनेक नाती झाली आहेत उद्ध्वस्त)
(इंग्रजी भाषेमध्ये हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)