मुंबई टाइम्स टीम
प्रेमात पडण्याची भावना खूप सुंदर असते. मात्र, अनेकांना हे प्रेम आहे असे वाटतंच नाही. तेही जाणून घ्यायची काही लक्षणं आहेत. पाहा तर, मग तुम्हाला काय जाणवतंय?
१. तसं काही खास कारण नसताना तुमच्या आनंदाला पारावार राहत नाही. तुमचं नाजूक, लाजून हसणंही थांबत नाही. कुणी त्या व्यक्तीचं नाव काढलं, तरी तुमच्या चेहऱ्यावरचा नूर बदलतो. मनात तरंग उमटू लागतात. ती/तो समोर असो वा नसो, त्यासोबत घालवलेल्या आठवणी तुमच्या चेहऱ्यावर नकळतपणे हसू आणतात.
२. प्रत्येक गोष्टीत कटाक्ष ठेवता, त्याला/तिला हे आवडेल, की नाही याचा विचार करून शॉपिंग करता तेव्हा नक्कीच तुम्ही प्रेमात पडला आहात.
३. त्याच्या/तिच्या प्रत्येक आवडत्या गोष्टीची दखल घेऊ लागता, तेव्हा तुम्ही त्याच्या/तिच्याकडे आकर्षित होताय हे जाणा.
४. त्यानं/तिनं पाठवलेले मेसेज, व्हॉट्स अॅप पिंग तुम्ही वारंवार वाचत असाल, तर कुठंतरी पाणी मुरतंय हे नक्की.
५. ती व्यक्ती अवतीभोवती असो वा नसो तिचं नाव कानी पडलं, तरी पोटात गुदगुल्या व्हायला लागतात. तुम्ही कामात कितीही व्यग्र असाल किंवा मूड नसेल तेव्हा तिची/त्याची आठवण तुमच्या मनाला सुखावते आणि तुम्ही स्वप्नात रमायला लागता.
६. त्याच्या/तिच्याशी सारखी भेट कशी होईल, नजरानजर कशी होईल यासाठी क्षुल्लक काम घेऊन तुम्ही त्याच्या/तिच्याकडे जात असल्यास तुम्हाला त्या व्यक्तीशिवाय करमत नाही हे खरं.
७. तिचं/त्याचं मन आपल्याकडून दुखणार नाही याची तुम्ही गांभीर्यानं दखल घेता.
प्रेमात पडण्याची भावना खूप सुंदर असते. मात्र, अनेकांना हे प्रेम आहे असे वाटतंच नाही. तेही जाणून घ्यायची काही लक्षणं आहेत. पाहा तर, मग तुम्हाला काय जाणवतंय?
१. तसं काही खास कारण नसताना तुमच्या आनंदाला पारावार राहत नाही. तुमचं नाजूक, लाजून हसणंही थांबत नाही. कुणी त्या व्यक्तीचं नाव काढलं, तरी तुमच्या चेहऱ्यावरचा नूर बदलतो. मनात तरंग उमटू लागतात. ती/तो समोर असो वा नसो, त्यासोबत घालवलेल्या आठवणी तुमच्या चेहऱ्यावर नकळतपणे हसू आणतात.
२. प्रत्येक गोष्टीत कटाक्ष ठेवता, त्याला/तिला हे आवडेल, की नाही याचा विचार करून शॉपिंग करता तेव्हा नक्कीच तुम्ही प्रेमात पडला आहात.
३. त्याच्या/तिच्या प्रत्येक आवडत्या गोष्टीची दखल घेऊ लागता, तेव्हा तुम्ही त्याच्या/तिच्याकडे आकर्षित होताय हे जाणा.
४. त्यानं/तिनं पाठवलेले मेसेज, व्हॉट्स अॅप पिंग तुम्ही वारंवार वाचत असाल, तर कुठंतरी पाणी मुरतंय हे नक्की.
५. ती व्यक्ती अवतीभोवती असो वा नसो तिचं नाव कानी पडलं, तरी पोटात गुदगुल्या व्हायला लागतात. तुम्ही कामात कितीही व्यग्र असाल किंवा मूड नसेल तेव्हा तिची/त्याची आठवण तुमच्या मनाला सुखावते आणि तुम्ही स्वप्नात रमायला लागता.
६. त्याच्या/तिच्याशी सारखी भेट कशी होईल, नजरानजर कशी होईल यासाठी क्षुल्लक काम घेऊन तुम्ही त्याच्या/तिच्याकडे जात असल्यास तुम्हाला त्या व्यक्तीशिवाय करमत नाही हे खरं.
७. तिचं/त्याचं मन आपल्याकडून दुखणार नाही याची तुम्ही गांभीर्यानं दखल घेता.