असं वाटू लागतं की या व्यक्तीला निवडून आपण चुकी केली आहे. असं वाटणे म्हणजेच ती लक्षणे असतात जी तुम्हाला संकेत देत असतात की हे नातं लग्नानंतर टिकणे अशक्य आहे. आज आम्ही तुम्हाला याच लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत. ही लक्षणे ओळखून तुम्ही ठरवू शकता की तुमचं नातं लग्नानंतर टिकेल की नाही!
संवाद नीट न होणे
तुम्ही दोघेही सतत मोबाईलवर व्यस्त असता का? जेव्हा कधी तुम्हाला एकांतात मोकळा वेळ मिळतो तेव्हा एकमेकांशी काय बोलावे, कसे व्यक्त व्हावे हे तुम्हाला कळत नाही का? दिवसभर तुम्हाला एकमेकांची आठवण येत नाही का? एकमेकांना फोन करावासा वाटत नाही का? तुम्ही जे काही म्हणालं त्याला तुमचा जोडीदार दुजोरा देणार नाही अशी तुम्हाला भीती वाटते का? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा अशी आहेत तर तुम्ही आताच स्वत:च्या भविष्याचा विचार करायला हवा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे दर्शवतात की ना तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दळ ओढ आहे ना तुमच्या जोडीदाराला तुमच्याबद्दल! अशावेळी लग्नानंतर असे नाते टिकणे निव्वळ कठीण ठरते. नात्यात संवाद असेल तरच नाते शेवटपर्यंत टवटवीत राहते.
(वाचा :- अर्जुन व मलायकाच्या नात्याबाबत अनिल कपूरच्या आहेत ‘या’ भावना!)
कम्फर्ट लेवल
असे काही कपल्स असतात जे एकमेकांवर प्रेम तर करतात पण पर्सनेलिटीच्या बाबतीत त्यांना आपल्या जोडीदाराबद्दल जुळवून घेणे कठीण जाते. काही जण असे असतात जे आपल्या जोडीदाराला वाईट वाटेल म्हणून याबद्दल काही बोलत नाहीत तर काही जण असतात जे उघडपणे बोलतात. तुम्ही यापैकी कोणत्याही प्रकारातले असाल तर यातून सिद्ध होते की तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जुळवून घ्यायला जमत नाहीये. लग्नानंतर तुमचा हा त्रास अधिक वाढू शकतो आणि त्याचा थेट परिणाम नात्यावर होऊन आयुष्यभर तुम्ही असमाधानी राहू शकता.
(वाचा :- म्हणून ऐश्वर्या राय बनली अमिताभ बच्चन यांची लाडकी सून!)
एकटेपणाची भावना
तुम्ही नात्यामध्ये आहात, पण तरी तुम्हाला एकटेपणा वाटतो का? तर मग तुम्ही आवर्जून या नात्याचा दहावेळा विचार करायला हवा. तुमच्या जोडीदाराला तुमची किंमत नसले, तो आपल्या आयुष्यात खुश असेल, तो आनंदी राहत असले, पण तुम्ही राहत नसाल तर मग हे मान्य करावं की कुठेतरी काहीतरी चुकतंय! कदाचित तुम्ही चुकीच्या व्यक्तीची निवड केली आहे. तो व्यक्ती तुमच्या सोबत खुश आहे पण तुम्ही नाही. एकटेपणा वाटणे ही भावना अतिशय त्रासदायक आहे कारण हा एकटेपणा पुढे जाऊन मानसिक त्रास आणि डिप्रेशन देऊन शकतो आणि अख्खं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं.
(वाचा :- आई-वडिलांच्या आशीर्वादानेच करायचा आहे प्रेमविवाह? मग अशी मिळवा त्यांची सहमती!)
सतत वाद होणे
लोक म्हणतात की ज्या नात्यात सर्वाधिक भांडणे होतात त्या नात्यात सर्वात जास्त प्रेम असते. पण तुम्ही वास्तविक विचार केला तर दिसून येईल की अशा नात्यात दोघेही कधीच सुखी नसतात. कारण कधी कोणत्या गोष्टीवरून भांडण होईल हे त्यांचे त्यांनाही माहित नसते. कधी कधी भांडण होणे वेगळी गोष्ट आहे आणि रोज सतत भांडणे होणे ही गंभीर गोष्ट आहे. जर प्रयत्न करून सुद्धा ही गोष्ट कमी होत नसले तर लग्नानंतर होणाऱ्या वादाबद्दल तुम्ही आताच विचार करायला हवा. कारण आयुष्यभर असं वाद घालत जगणे कोणासाठीच सोपे नसते.
(वाचा :- हे असतात मुलींच्या स्वभावाचे विविध प्रकार, तुमची पत्नी कोणत्या प्रकारात येते?)
आदर न मिळणे
ज्या नात्यात आदर असतो ते नातं कधीच खराब होत नाही. कारण त्यातून दोघांना एकमेकांबद्दल असणारी किंमत कळते. पण ज्या नात्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला आदर देताय पण तो तुम्हाला अजिबातच आदर देत नाही व तुमच्या कोणत्याच गोष्टीला गांभीर्याने घेत नाही त्या नात्यात तुम्ही खरंच खुश राहू शकता का हा प्रश्न तुम्ही स्वत:च स्वतःला विचारायला हवा. नात्यात आदर नसले तर लग्नानंतर नातं कितपत टिकेल याबाबत शंकाच असते.
(वाचा :- या ५ कारणांसाठी आवर्जुन माना आपल्या वडिलांचे ‘आभार’)