बहुतांश मुली जोडीदारामध्ये विशेष गुण आढळल्यानंतरच लग्नाचा निर्णय घेतात. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) देखील अशांपैकीच एक आहे, जिनं अभिनेता कुणाल खेमूमधील (Kunal Khemu) चांगल्या गुणांची पारख करून त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. खुद्द सोहानं एका मुलाखतीमध्ये कुणालच्या चांगल्या स्वभावाचे जाहीरपणे कौतुक केलं होतं.
('तो बॉयफ्रेंड होण्यास लायक नाही' सोनमचं रणबीरबाबत मोठं विधान, रिलेशनशिपपूर्वी मुली मुलांमध्ये शोधतात 'हे' गुण)
जेव्हा करपलेलं जेवण जेवावे लागले
सोहाने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की 'मला स्वयंपाक करायला अजिबात येत नव्हते. मी कधी स्वयंपाक करण्याचा प्रयत्नही केला नाही. तरीही मी कुणालसाठी जेवण तयार करण्याचं ठरवलं. कुणालसाठी मी पहिल्यांदाच काहीतरी पाककृती करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस जेवण पूर्णपणे करपले होते. पण यानंतरही कुणालने करपलेले जेवण खाल्ले आणि माझ्या प्रयत्नांचे कौतुक केले, याच गोष्टीनं माझ्या मनात घर केलं'.
('वडील चोप देतील'५५ वर्षांच्या सलमानला कशाची आहे भीती? उत्तर ऐकून म्हणाल घरोघरी मातीच्या चुली)
एखादी गोष्ट मनाला भावली म्हणून हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार असं पक्कं करणारी सोहा अली खान ही एकमेव तरुणी नाही. तर आजच्या काळात बहुतेक तरुणी भावी जोडीदारामध्ये काही-न्-काही खास गोष्टी शोधतच असतात.
कमतरता शोधणाराही असावा
काही तरुणींना असाही पार्टनर आवडतो, जो त्यांचं केवळ कौतुक करण्याऐवजी कमतरता देखील दाखवेल. पण कमतरता सांगण्याची पद्धत अतिशय शांत आणि प्रेमळ असावी. कारण पत्नीकडून एखादी चूक झाल्यास काही लोक त्याच चुका खूप मोठ्या व गंभीर असल्याचं भासवतात. हा स्वभाव कोणत्याही व्यक्तीला आवडणार नाही. यामुळे पती-पत्नीमध्ये फक्त वादच निर्माण होऊ शकतात. परिणामी जोडीदार आपल्या पार्टनरपासून दुरावला जातो.
('... मग मी शांत झोपू शकलो नसतो' नेहासोबतच्या ब्रेकअपनंतर आलेला कटु अनुभव हिमांशनंही केला व्यक्त)
जेव्हा सोहाने कुणालच्या ताटामध्ये करपलेले जेवण वाढलं तेव्हा अभिनेत्यानं स्वयंपाकातील कमतरता शोधून काढण्याऐवजी तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सोहाचा स्वयंपाक करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, हे त्याला माहिती होते. म्हणूनच चुका दाखवणे योग्य ठरणार नाही.
आर्थिक व्यवहाराचा निर्णय घेण्याचा अधिकार
लग्नानंतर पत्नीच्या पगारावर तिनं ठरवलं तरच पती हक्क दाखवू शकतो. पण पतीने हे लक्षात घ्यायला हवे की तिचा पूर्ण पगार संसार आणि कुटुंबीयांवर खर्च करण्यासाठी असू शकत नाही. पत्नीला हवे असल्यास ती पगारातील काही भाग आपल्या आई-वडिलांवरही खर्च करू शकते.
('मित्रांनीच माझ्या पाठीवर केले वार...' श्रेयस तळपदेच्या या गौप्यस्फोटात दडलंय मैत्रीतील कटु सत्य)
माझ्या हृदयात फक्त तुलाच स्थान
सुंदर वस्तू आणि सुंदर दिसणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पुरुष व महिला सुद्धा सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतातच. पण परफेक्ट पार्टनर व्हायचे असेल तर समोर कितीही सुंदर स्त्री असली तरी आपल्या हृदयातील जोडीदाराचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही, हे प्रत्येक मुलाने लक्षात ठेवलं पाहिजे.
प्रियकराकडून - पतीकडून तुम्हाला सर्वांसमोर स्पेशल ट्रीटमेंट मिळत असेल तर आपण नक्कीच योग्य व्यक्तीसोबत नातेसंबंधात आहात.
(रब ने बना दी जोडी! विराट व अनुष्का लग्नापूर्वी गुपचुप का भेटायचे? ‘हे’ होते मोठे कारण)
पाठिंबा देणारा पती
जीवनाच्या प्रत्येक वळणावर, अडचणीत, आनंदात कायमच पाठीशी उभा राहणारा, योग्य मार्गदर्शन करणाराच जोडीदार प्रत्येक तरुणीला आयुष्यात हवा असतो. कारण असंख्य कारणांमुळे जीवनावर चांगले-वाईट परिणाम होत असतात. वाटेत अडचणी येतील, यश-अपयशाचाही सामना होत राहील, अशा परिस्थितीत पार्टनर सोबत असणं आवश्यक असते. तुमच्यावर विश्वास करणारा तसंच तुम्हाला कोणत्या क्षणी त्याची गरज आहे, हे समजून घेणारा व्यक्ती प्रत्येकाला हवा असतो.
('मी मूल जन्माला घालणारं यंत्र नाही' विद्या बालनही भडकली! लग्नानंतर महिलांवरच का असतो दबाव?)