अ‍ॅपशहर

आई-वडिलांच्या आशीर्वादानेच करायचा आहे प्रेमविवाह? मग अशी मिळवा त्यांची सहमती!

आजही भारतातील अनेक राज्यात प्रेमविवाह खुल्या मनाने स्विकार केला जात नाही. त्यामुळे जर तुम्ही देखील अशा कोणत्या अडचणीत असाल तर तुमचं प्रेम मिळवण्यास या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2020, 3:47 pm
भारतात अशी अनेक कुटुंब आहेत जिथे आजही प्रेमविवाहास परवानगी नाहीये. अशा परिस्थितीत कुटुंबातील कोणत्या सदस्याला प्रेम झालं तर ती त्याच्यासाठी एक मोठी समस्या बनते. त्यामुळे कुटुंबीयांची परवानगी मिळवण्यासाठी या काही टिप्स कामी येऊ शकतात. जस जशी वेळ बदलत गेली तस तसं भारतीय संस्कृतीत लग्न या विषयामध्ये अनेक बदल होत गेले. आताच्या काळात प्रेमविवाह किंवा अरेंज्ड मॅरेज दोन्हीही अगदी सामान्य झाले आहे. पण तरीही आजही अशी बरीच कुटुंब आहेत जिथे प्रेमविवाह करण्यास परवानगी नाहीये.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what to do if parents rejects love marriage in marathi
आई-वडिलांच्या आशीर्वादानेच करायचा आहे प्रेमविवाह? मग अशी मिळवा त्यांची सहमती!


जर तुमच्या घरातही असे काही नियम असतील आणि तुम्ही मात्र नकळत कोणाच्या प्रेमात पडला असाल पण तुम्हाला आई-वडिलांच्या आशीर्वादानेच लग्न करायचे असेल तर आम्ही सांगितलेल्या काही खास टिप्स तुमच्या नक्की कामी येतील. या टिप्स वापरुन तुम्ही आपल्या जोडीदाराची माहिती आई-वडिलांना देऊ शकता व त्यांची परवानगी मिळवू शकता.

योग्य वेळेची निवड

जर तुम्हाला आधीच माहित असेल की ते लग्नाला विरोध करणार तर मात्र तुम्ही योग्य वेळ बघूनच हा विषय त्यांच्यासमोर काढणं उत्तम! अशा वेळेची वाट बघा जेव्हा घरातील वातावरण टेन्शन फ्री असेल आणि आई-वडिलांचा मुड देखील खूप चांगला असेल. अशी योग्य वेळी हाती लागताच बोलता बोलता त्यांना सांगा की तुम्हाला कोणीतरी आवडतं आणि त्या व्यक्तीसोबतच तुम्हाला आयुष्य व्यतीत करायचं आहे.

(वाचा :- हे असतात मुलींच्या स्वभावाचे विविध प्रकार, तुमची पत्नी कोणत्या प्रकारात येते?)

मदत घ्या

आई-वडिलांना आपल्या प्रेमाबद्दल काही सांगण्याआधी एखाद्या अशा नातेवाईकाची मदत घ्या ज्याचा आई-वडील खूप आदर करत असतील किंवा त्याच्या शब्दाला घरात मान असेल. त्यांच्यासोबत मिळून ठरवा की हा विषय कसा तुम्ही आई-वडिलांसमोर मांडू शकता आणि कशी त्यांची परवानगी चुटकीसरशी मिळवू शकता. तसेच आई-वडिलांशी बोलायला जाताना या नातेवाईकालाही सोबत जरुरु घेऊन जा. जेणे करुन परिस्थिती हाताबाहेर गेली अथवा पालक चिडले तर तो नातेवाईक सर्व परिस्थिती चलाखीने हाताळेल.

(वाचा :- या ५ कारणांसाठी आवर्जुन माना आपल्या वडिलांचे ‘आभार’)

स्वत:ला परिपक्व सिद्ध करा

हा मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा असतो. कारण जर आई-वडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत असं वाटत नसेल तर ते कधीच तुम्ही घेतलेल्या निर्णयास दुजोरा देणार नाहीत. म्हणूनच आई-वडिलांचा विश्वास जिंकून त्यांना हे पटवून द्या की तुम्ही स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास समर्थ असून तुम्ही एक परिपक्व (Matured) व्यक्ती आहात. त्यामुळे तुम्ही लग्नासारखा निर्णय पूर्णत्वास नेऊ शकता. तरच ते तुमचं बोलणं गांभिर्याने घेतील.

(वाचा :- हे आहे भांगात कुंकू भरण्यामागचं शास्त्रीय कारण!)

जोडीदाराची खासियत सांगा

जोडीदाराविषयी सर्व माहिती आपल्या आई-वडिलांना सांगा. करियर, नोकरीपासून तुमच्या कुटुंबासाठी ती व्यक्ती कशी योग्य आहे हे त्यांना पटवून द्या. तसेच कधी कोणत्या संकटमय काळात तुमच्या जोडीदाराने तुमची सर्वोत्तम काळजी घेत साथ दिली असेल, तुम्हाला सावरलं असेल तर ते देखील आवर्जुन सांगा. कारण यामुळे आई-वडिलांना ही खात्री पटेल की तुम्ही पसंत केलेली व्यक्ती भविष्यात तुमची व्यवस्थित काळजी घेऊ शकते.

(वाचा :- या कारणांमुळे कधी कधी खोटं बोलणं देखील ठरतं नात्यासाठी लाभदायक)

संयम ठेवा

तुम्ही सांगता क्षणी तुमचे पालक लग्नासाठी सहमती देतील असं अजिबात नाही. त्यामुळे अशावेळी संयम ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जरी त्यांनी लग्नाला नकार दिला तरी तुम्ही शांत राहा आणि वेळोवेळी त्यांचं मत बदलले आहे का याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही आतातायीपणे आपला राग दाखवला तर आई-वडील लग्नासाठी तयार होतील देखील पण लग्नानंतर तुमच्या जोडीदाराला स्वीकारणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसेल.

(वाचा :- नात्यात दुरावा नको असल्यास प्रत्येक जोडप्याने घ्यावी या गोष्टींची काळजी)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज