खरा मित्र तोच असतो जो नेहमी तुमचे चांगलेच चिंतत असतो. पण जर तोच तुमच्या त्रासाचे सर्वात मोठे कारण बनत असेल तर तुम्ही अशा मित्रांपासून लवकरात लवकर दूर व्हावे. या लेखाद्वारे आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत, जो बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी संबंधित आहे. (फोटो सौजन्य - इंडिया टाइम्स)
(ईशा-करीनाच्या खास मैत्रीत या चुकीमुळे पडला मिठाचा खडा, असा हस्तक्षेप कोणालाही नाही आवडणार)
मित्र-मैत्रिणींमुळे दुखावलं मन
शिल्पाने एका मुलाखतीत रिलेशनशिपसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होता. तिच्या मित्र-मैत्रिणींमुळे तिचं मन दुखावलं गेल्याचा किस्सा तिनं सांगितला. शिल्पाने सांगितलं की, 'मी एका अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते, ज्याच्यासोबत माझ्या मित्र-मैत्रिणींनी पैज लावली होती. माझ्यासोबत नाते निर्माण करणं ही त्यांची पैज होती. माझ्या मित्रांनी त्या व्यक्तीला माझ्याशी नाते जोडण्याचे आव्हान दिले. हे थोडं फिल्मी वाटेल, पण ते खरं आहे. नंतर त्या माणसाने माझ्याशी संबंध तोडले कारण त्याला फक्त पैज जिंकायची होती. सत्य समजल्यानंतर माझे हृदय दुखावलं गेलं'. अशा प्रकाराचा सामना करणारी शिल्पा ही एकमेव तरुणी नाही. मित्र-मैत्रिणींच्या थट्टा-मस्करीमुळे आतापर्यंत अनेकांचे मन दुखावले गेल्याचे आपण आपल्या आसपास पाहिले असेल. तुम्ही यास विनोद मानत असाल पण असे कृत्य करणाऱ्या मित्रांपासून कायम नुकसानच पोहोचते हे लक्षात घ्या. असे मित्र तुमची अन्य नाती देखील खराब करू शकतात तसंच तुम्हाला मोठ्या संकटात पाडू शकतात.
(बच्चन कुटुंबीयांच्या घरात यंदाच्या दिवाळीत पसरली शांतता, या कारणामुळे अनेक नाती झाली आहेत उद्ध्वस्त)
स्वार्थी मित्रांपासून राहा दूर
अनेक वेळा आपण लोकांना ओळखण्यात चूक करतो आणि त्यांना मित्र मानतो. पण ही मंडळी केवळ स्वार्थापोटी तुमच्यासोबत असतात. अशा मित्रांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या वागण्यातून आपणास याबाबतची माहिती समजू शकेल. स्वार्थी हेतू पूर्ण होईपर्यंत असे मित्र तुमच्यासोबत राहतात. अनेकवेळा तुम्ही पाहिलं असेल की काही मित्रांचं जेव्हा काम असते तेव्हाच त्यांना तुमची आठवण येते, अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.
(सावधान! जिवलग मित्रांसोबतही या 4 गोष्टी चुकूनही करू नका शेअर, अन्यथा…)
नकारात्मक विचारांचे मित्र पोहोचवू शकतात नुकसान
तुमच्या आयुष्यात असे काही मित्र असतील जे नेहमी नकारात्मक बोलत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात करा. अनेक वेळा अशा मित्रांनाही तुमचा हेवा वाटतो आणि ते तुमच्याशी वाईट वागण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशाप्रकारे तुमच्या पाठीमागे किंवा तुमच्याशी चुकीचे वागणारे मित्र तुमचेच नुकसान करतात. म्हणूनच अशा मित्रांना सोडून जे तुम्हाला प्रोत्साहन देतात त्यांच्यासोबत राहणे चांगले.
दु:ख पोहोचवणाऱ्या मित्रांसाठी तुम्ही महत्त्वाचे नसता
दोन मित्रांमध्ये कधीच भांडण होणार नाहीत, असे मुळीच नव्हे. प्रत्येक नातेसंबंधात वाद होणे ही फार सामान्य बाब आहे. पण जर एखादा मित्र वारंवार तुमच्या भावना दुखावत असेल आणि माफी मागून सर्वकाही विसरण्यास सांगत असेल तर त्याबद्दलही काळजी घ्या. असे लोक तुमचा आदार करत नाहीत आणि ते तुमच्या वेदना जाणून घेऊ शकत नाहीत. हेच कारण आहे की अनेकदा आपण एकटे पडता कारण ज्यांना तुम्ही मित्र मानता त्यांना तुमचे महत्त्व कळत नाही.
(याला म्हणतात खरं प्रेम! निकच्या या आजारामुळे प्रियंका रात्रभर जागून त्याची काळजी घ्यायची, कारण…)
सच्चे मित्र कसे असतात?
तुमच्या मित्र-मैत्रिणींची यादी खूप मोठी आहे आणि प्रत्येकजण तुमच्या हिताचाच विचार करतो, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नसते. खरे मित्र मोजकेच असतात, जे तुमच्या यशाने आनंदी होतात, तुम्हाला योग्य सल्ला देतात आणि जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा साथही देतात. तुम्हाला हे समजले पाहिजे की मित्रांची यादी खूप मोठी नसली तरी चालेल परंतु अशी असावी की जे नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील.
(सुष्मिता सेनबद्दल बॉयफ्रेंडने केलं मोठं विधान, बहुतांश पुरुषांकरीता ही गोष्ट नसते सोपी)