काही दिवसांनी जाणवतील आणि तेव्हा पश्चाताप करण्यापेक्षा आताच हेअर केअर करणे इष्ट ठरेल. तर ही हेअर केअर घेताना देखील काही गोष्टी माहित असायला हव्यात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे रात्री झोपताना केसांना तेल लावणे होय. ही गोष्ट सामान्य असेल तरी तितकी सुद्धा सामान्य नाही. थांबा गोंधळून जाऊं नका. याबाबत आज सगळं काही जाणून घ्या.
रात्रभर केसांना तेल लावू नका
डॉ. रेखा राधामणि या एक आयुर्वेदिक जाणकार असून खूप लोक त्यांना फॉलो करतात आणि त्या ह्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. तर त्यांनी नुकतीच इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण त्यांनी त्यात लिहिले होते की रात्रभर केसांना तेल लावून ठेवू नका. काय? तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना? पण त्या असं का म्हणतायत? यामागे त्यांची सुद्धा नक्कीच काहीतरी कारणे असतील. चला जाणून घेऊया.
कफ दोष समस्या वाढू शकते
आयुर्वेद मध्ये तीन प्रकारचे दोष असतात. ज्यामध्ये वात, पित्त आणि कफ या दोषांचा समावेश होतो. जर तुम्ही रात्रभर केसांना तेल लावून ठेवत असाल तर कफ दोष वाढवण्याची शक्यता असते. आता अनेकांना हा कफ दोष आहे काय हे माहित नसते. तर मंडळी कफ दोष वाढण्याचा अर्थ आहे स्कॅल्पला म्हणजेच टाळूला खाज येणे, ऑईली डॅंड्रेफ आणि ऑईली केस होय. या सर्व समस्या निर्माण झाल्या तर साहजिकच त्या तुमच्या केसांना कमकुवत बनवू शकतात.
केसांना लगेच धुवावे का?
अनेक लोकांना असे वाटते की रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने हेअर ग्रोथ होते वा केसांची वाढ जलद गतीने होते. एवढेच नाही तर अनेकांचा असा गैरसमज होतो की यामुळे हेअर फॉलची समस्या रोखली जाऊ शकते. पण विश्वास ठेवा मंडळी, हे निव्वळ गैरसमज असून असे कोणत्याही प्रकारचे फायदे केसांना रात्रभर तेल लावून ठेवल्याने मिळत नाहीत. आयुर्वेदानुसार तुम्ही केसांना तेल लावल्यानंतर केस लगेच धुण्याचा सल्ला दिला जातो.
(वाचा :- Skin Care Tips : या चुकांकडे दुर्लक्ष केलंत तर त्वचा रूक्ष झालीच म्हणून समजा, आताच सावध व्हा)
केसाला तेल लावण्याबाबत महत्त्वाची गोष्ट
तुम्ही केसाला तेल लावत असाल तर ती एक चांगलीच गोष्ट आहे. पण केसांना किती वेळ तेल लावावे हे मात्र माहित असले पाहिजे. जाणकारांच्या मते जर आयुर्वेदात सांगितलेले दोष उद्भवू नयेत असे वाटत असेल तर केसांना तेल लावल्यावर ते जास्तीत जास्त 30 ते 45 मिनिटे ठेवावे. शिवाय तेल लावून झाल्यावर काहीच वेळाने अंघोळ करावी वा केस धुवावे. डॉक्टर रेखा राधामणी यांच्या मते या सर्व गोष्टी त्यांना केरळी आयुर्वेदिक पद्धती मधून कळल्या आहेत आणि त्या खरंच परिणामकारक आहेत.
(वाचा :- ओठ राहतील गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे मखमली व गुलाबी, फॉलो करा या ५ टिप्स)
आयुर्वेदावर अविश्वास
डॉक्टर रेखा राधामणी यांनी सोबतच एक खंत सुद्धा व्यक्त केली की सध्या लोकांचा आयुर्वेदावर विश्वास नाही. आयुर्वेद ही आपली संस्कृती आहे, आपला अभिमान आहे. पण आज आपलीच लोकं त्यांची खिल्ली उडवतात. त्याला जुनाट समजतात. पण त्यांना माहित नसावं की आजची आधुनिक औषधी आणि उपचार पद्धती आयुर्वेदामधूनच विकसित झाली आहे. आजही जिथे आजच्या आधुनिक पद्धती फोल ठरतात तेव्हा आयुर्वेद मदतीला येते. त्यामुळे आपण आयुर्वेदावर विश्वास ठेवावा असे डॉ. रेखा राधामणी आवाहन करतात.