लिंबू आणि मध पाणी
- कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
- लिंबाचा रस त्वचेच्या आजारांना कारणीभूत असलेल्या बुरशीची वाढ कमी करतो. त्याचबरोबर यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवर चमक आणते.
- मध देखील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विरोधी दाहक आहे.
- त्वचेला संसर्गापासून वाचवण्यासोबतच ते तेलावर नियंत्रण ठेवते आणि त्वचेला चमक आणते.
(वाचा :- दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितला रामबाण उपाय, एका आठवड्यात थांबेल केस गळणं)
ग्रीन टी
- जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर सवयीत थोडा बदल करा. सकाळच्या दुधाचा चहा ग्रीन टीने दिवसाची सुरुवात करा
- रात्रभर मंद झालेली चयापचनाची क्रिया ग्रीन टीमुळे सक्रिय होते.
- त्यात फ्लेव्होनॉइड्स देखील असतात जे वृद्धत्व कमी करतात.
- या चहाच्या गरम कपमध्ये असलेले पॉलिफेनॉल विषारी पदार्थ बाहेर टाकून त्वचा निर्दोष बनवतात.
(वाचा :- या 7 गोष्टी त्वचेसाठी ठरतील 'घातक विष', या गोष्टी लगेच खाणे बंद करा)
काकडी आणि पालक रस
- पालकाची काही ताजी पाने काकडीत मिसळून त्याच ज्यूस बनवा. त्यात एक चमचा मध घातल्यास तुम्हाला जास्त फायदा होईल.
- हा फायबर युक्त रस तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करेल .
- काकडी आणि पालक या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते.
- हा रस नियमित प्यायल्याने त्वचेच्या पिगमेंटेशनची समस्या दूर होते. त्याच वेळी, काळे डाग आणि पुरळ कमी होते.
(वाचा :- पचनशक्ती बरोबरच ताकाचे आहेत अनेक बहुगुणी फायदे, त्वचा व केसांसाठी तर जणू अमृतच)
गाजर आणि बीट रस
- गाजर आणि बीटरूट ही दोन्ही पोषक तत्वांची मुबलकता असते.
- त्वचा आणि केस हेल्दी बनवण्यासोबतच या दोन्हींचा रस बद्धकोष्ठता दूर करते.
- हे संपूर्ण शरीर डिटॉक्सिफाय करते आणि यकृताचे कार्य देखील राखते.
- हा रस त्वचेला हायड्रेट करतो आणि मऊ करतो. त्याचबरोबर ज्यांना मुरुमे सहज होतात, त्यांचीही या समस्येपासून सुटका होते.
(वाचा :- कारल्याचा रस चेहऱ्याला लावून पाहा, जाणून घ्या या कडू कारल्याचे औषधी फायदे)
हळदीचे दूध
- त्वचेचा रंग खूलवण्यासाठी हळद दुधात मिसळून प्यायल्यास त्याची ताकदही दुप्पट होते.
- हळदीतील बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवतात आणि दुधातील कॅल्शियम आणि इतर पोषक घटक त्वचेला नवजीवन देतात.
- हळदीचे दूध, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, नवीन पेशींच्या वाढीस गती देते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. यामुळे त्वचा तरुण आणि निरोगी दिसते.
(वाचा :- वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य)