वेळीच या समस्येवर उपाय न केल्यास भविष्यात पायांची समस्या गंभीर होऊ शकते. पायांची त्वचा निरोगी राहण्यासाठी काही सोपे घरगुती व नैसर्गिक औषधोपचार करावेत. घरच्या घरी पायांची नियमित कशी काळजी घ्यावी? नेमके काय उपाय करावेत? याबाबत आपण काही सोप्या टिप्स जाणून घेऊया. या टिप्स तुम्ही योग्य पद्धतीनं फॉलो केल्यास भेगा पडलेल्या टाचांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
(चेहऱ्यावर हवंय नैसर्गिक तेज? जाणून घ्या ग्वा-शा मसाजचं तंत्र आणि फायदे)
गरम पाण्याने पाय धुऊ नका
थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने आंघोळ केल्यानं शरीराला आराम जरी मिळत असला तरीही आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी हा एक चांगला पर्याय अजिबात नाही. गरम पाण्यामुळे आपल्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. ज्यामुळे पायाची त्वचा कोरडी होऊ लागते. हे नुकसान टाळण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळी करावी. पण जर तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असल्यास, १० मिनिटांमध्येच स्नान करण्याचा प्रयत्न करावा.
नियमित स्वरुपात करा एक्सफोलिएशन
टाचांवरील त्वचा आपल्या शरीराच्या अन्य अवयवांवरील त्वचेच्या तुलनेत किंचितशी जाड असते. यामुळे टाचांवर अतिरिक्त ताण आल्यास भेगा पडण्याची समस्या उद्भवते. टाचांची त्वचा मऊ ठेवण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे नियमित स्वरुपात टाचेची त्वचा एक्सफोलिएट करावी. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि मृत त्वचेची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.
नियमित लावा फुट क्रीम
शरीराची त्वचा मऊ आणि नितळ राहण्यासाठी आपण प्रत्येक दिवशी बॉडी लोशनचा उपयोग करतो, त्याच प्रमाणे आपल्या पायांच्या त्वचेलाही मॉइश्चराइझर लावणं आवश्यक आहे. आंघोळ केल्यानंतर न विसरता टाचांवर हायड्रेटिंग फुट क्रीम लावा. यामुळे त्वचेमधील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी देखील पायांवर क्रीम लावा आणि त्यानंतर मोजे घाला.
पायांना लावा ऑलिव्ह ऑइल
टाचांच्या भेग दूर (Skin Care Tips) करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल हा नैसर्गिक रामबाण उपाय आहे. या तेलातील पोषण तत्त्व आपली त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्याचे कार्य करतात. यासाठी आपण ऑलिव्ह ऑइलनं पायांचा हलक्या हातानं मसाज करावा. १५ मिनिटांसाठी हळू-हळू पायांचा मसाज करा. पायांवर तेल राहू द्यावे आणि थोड्या वेळाने मोजे घालावेत. असे केल्यानं पायाची त्वचा मऊ राहते.
(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)जास्ती जास्त पाणी प्या
शरीरामध्ये पाण्याची (Water Benefits For Skin) कमतरता निर्माण झाल्यास कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. भेगा पडलेल्या टाचांची समस्या देखील यामुळे कमी होऊ शकते. दिवसभरात शक्य असेल तेवढे पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होणार नाही. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे.
(घरच्या घरी या ६ सामग्रींपासून कसं तयार करावं बॉडी पॉलिशिंग स्क्रब, जाणून घ्या माहिती)
गरम पाणी का प्यावे?
अतिरिक्त प्रमाणात गरम पाणी पिणे टाळावे.