अ‍ॅपशहर

दुस-यांदा आई-बाबा बनण्याची इच्छा असेल तर ‘या’ गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप!

दुसरं बाळ जन्माला घालणं एक मोठी जबाबदारी घेऊन येतं. त्यामुळे दुस-या बाळाचा विचार करण्यापूर्वी खाली दिलेल्या सर्व पैलू पडताळून पाहा. काय आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2021, 1:48 pm
अनेक स्त्रियांना दुसऱ्या गरोदरपणा विषयी खूप प्रश्न असतात. जे की पडलेच पाहिजे कारण दुसऱ्या गरोदरपणाचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्या आधी काही गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. करीना कपूर (kareena kapoor) सुद्धा दुसऱ्यांदा आई होते आहे, तिने आणि सैफ अली खान यांनी सुद्धा दुसऱ्यांदा आई बाबा होण्याचा निर्णय अगदी विचारपूर्वक घेतल्याचे एका मुलाखती दरम्यान सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम these tips can be helpful for second pregnancy planning like kareena kapoor in marathi
दुस-यांदा आई-बाबा बनण्याची इच्छा असेल तर ‘या’ गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप!


तुम्ही सुद्धा दुसऱ्यांदा गरोदर राहू इच्छित असाल तर काही गोष्टींचा आवर्जून विचार करा कारण तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या पूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकू शकतो. सध्याची पिढी सुज्ञ आहे. ते प्रत्येक निर्णय विचारपूर्वकच घेतात. पण तरी असे काही घटक आहेत ज्याबद्दल प्रत्येक जोडप्याने दुसऱ्यांदा आई बाबा होताना विचार केला पाहिजे. आज या लेखात आपण त्याबद्दलच जाणून घेऊया.

पहिल्या बाळाचे वय

दुसऱ्या गरोदरपणाचा विचार करताना हा घटक सर्वात महत्त्वाचा ठरतो. पहिले बाळ बऱ्यापैकी मोठे झाले व सजाण झाले की त्यानंतरच दुसऱ्या मुलाचा चान्स घ्यावा. ज्या प्रमाणे करीना कपूर आणि सैफ आली खान यांनी आपल्या दोन मुलांच्या मध्ये पुरेसे अंतर ठेवले आहे त्याप्रमाणे अंतर राखणे फायदेशीर ठरते. दोन्ही मुलांच्या वयात अंतर असल्याने दोघांच्या गरजा बदलतात. या व्यतिरिक्त पाहिलं मुल मोठं असल्याने ते जस जसं मोठं होत जाईल तस तसं स्वत:हून आपल्या भाऊ/बहिणीची काळजी घेऊ लागेल. शिवाय पुढे दोघांच्या खर्चाचे ओझे सुद्धा एकत्र अंगावर येणार नाही.

(वाचा :- डिलिव्हरीआधी ठीक यावेळी बाळ योनीच्या दिशेने सरकते, योग्य वेळ जाणून घ्या व राहा तयार!)

दोन डिलिव्हरीमधील अंतर

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे दोन्ही डिलिव्हरीमधील अंतर होय. 2016 साली करीनाने पहिल्या मुलगा तैमुर याला जन्म दिला आणि आता चार वर्षांनी तिच्या पोटी दुसरे अर्भक वाढत आहे. यावरून दिसून येते की सैफ अली खान आणि करीनाने कुटुंब नियोजनानुसारच दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचा विचार केला आहे. जाणकारांच्या मते दोन मुलांमध्ये व दोन डिलिव्हरींमध्ये किमान 18 महिन्याचे अंतर असावे. म्हणजेच दीड वर्षांचे अंतर होय. त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच. त्यामुळे हा काळ प्रमाण मानून दीड वर्षे किंवा त्या नंतरचा काळ लोटल्यावर दुसऱ्या मुलाचा विचार केला जाऊ शकतो.

(वाचा :- ‘या’ फर्टिलिटी ट्रिटमेंट्समुळे वाढते जुळी मुलं होण्याची शक्यता, ट्विंस हवे असल्यास नक्की ट्राय करा!)

आर्थिकदृष्ट्या सक्षम

तिसरा महत्त्वाचा घटक आहे कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम असणे. या महागाईच्या काळात मुलांना सांभाळणे हे सोप्पे नाही. जर तुम्ही अतिश्रीमंत घरातील असाल तर हा घटक तितकासा महत्त्वाचा ठरत नाही. पण आई वडील स्वत:च्या अंगावर जबाबदारी घेऊन मुलांना वाढवत असतील तर मात्र याबाबत त्यांनी विचार करणे गरजेचे ठरते. जर आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन्ही बाळांचे संगोपन उत्तम होईल. त्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जाईल. त्यामुळे जेव्हा आर्थिक स्थिती आपल्याने पेलवेल असे वाटत असले तेव्हाच हा निर्णय घ्यावा.

(वाचा :- आता घरच्या घरी डेटॉलने करू शकतो प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घेऊया टेस्टची योग्य पद्धत!)

आरोग्याची काळजी महत्त्वाची

चौथा महत्त्वाचा घटक आहे आरोग्याची काळजी. डिलिव्हरी वा गरोदरपणा ही कोणत्याही स्त्री साठी एक त्रासदायक प्रक्रिया असते. या काळात शरीरावर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतो. त्यामुळे सुद्धा दोन डिलिव्हरी मध्ये अंतर राखणे गरजेचे असते. जर पहिल्या डिलिव्हरी मध्ये समस्या आल्या असतीत तर दुसऱ्या डिलिव्हरी पर्यंत पुरेसे अंतर राखले गेलेच पाहिजे. शिवाय जर पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली असेल तरीही दुसऱ्या डिलिव्हरीसाठी किमान दीड वर्षे वाट पहावी. तोवर शरीर पुन्हा सगळा भार सोसण्यास सक्षम झालेले असते.

(वाचा :- आई बनण्यासाठी मोठ मोठ्या अभिनेत्रींनी केलंय एग फ्रीजिंग! जाणून घ्या तुम्ही कधी करू शकता?)

मुलांना वेळ देणे

हा शेवटचा घटक स्त्रीच्या दुष्टीने महत्त्वाचा आहे. जर पहिल्या मुलासाठीच वेळ पुरत नसले वा त्याचीच जबाबदारी दुसरा कोणी व्यक्ती घेत असेल आणि खास करून आई मुलाला वेळ देऊ शकत नसेल तर तिने दुसऱ्या गरोदरपणाचा निर्णय न घेतलेला बरा, कारण दोन मुलांचे संगोपन योग्य प्रकारे झाले नाही तर त्याचा मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणानंतर मुळे स्वत: सज्ञान होत नाहीत तोवर त्यांची काळजी घेणे आपल्याला शक्य होईल का हा विचार करूनच आई वडिलांनी दुसऱ्या गरोदरपणाचा निर्णय घ्यावा.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर चरबी वाढल्याने पोट सुटलेलं दिसतंय? 'या' उपायांनी मिळवा सपाट पोट व आकर्षक बांधा!)

महत्वाचे लेख