अ‍ॅपशहर

दहावीला आता ‘नो-फेल’

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शेरा न देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

Maharashtra Times 1 Sep 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10th exam
दहावीला आता ‘नो-फेल’


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आता अनुत्तीर्ण हा शेरा न देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण झाले असतील त्यांच्या गुणपत्रिकेवर उत्तीर्ण हा शेरा दिला जातो. तर, एकापेक्षा जास्त विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर अनुत्तीर्ण हा शेरा असतो. आता दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी सुविधेचा लाभ घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेता येतो. तसेच, दोनपेक्षा जास्त विषयांमध्ये नापास झाल्यानंतरदेखील कौशल्य विकासाच्या दृष्टीने इतर अभ्यासक्रम करता येऊ शकतात. त्यामुळेच येथून पुढे दहावीच्या गुणपत्रिकेवर येणारे शेरे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी जुलै/ऑगस्ट २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेपासून सुरू झाली आहे. दरम्यान, फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या गुणपत्रिकेवर तीन प्रकारचे शेरे असणार आहे. त्यामध्ये सर्व विषयांमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर उत्तीर्ण हा शेरा असेल. तर, एक किंवा दोन विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर एटीकेटीचा शेरा राहणार असून तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘पुरवणी परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा राहणार आहे. तर, पुरवणी परीक्षेमध्येही ‘कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ असा शेरा असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज