अ‍ॅपशहर

रोहयोची २२ हजार कामे अपूर्ण

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी ५३ हजार कामे सुरू असून त्यापैकी तब्बल २२ हजार ३०२ कामे अपूर्ण राहिली आहेत.

Maharashtra Times 20 May 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 thuosand narega works are incomplete
रोहयोची २२ हजार कामे अपूर्ण


जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी ५३ हजार कामे सुरू असून त्यापैकी तब्बल २२ हजार ३०२ कामे अपूर्ण राहिली आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी विभागाकडून नियोजन केले जात असले तरी कामांचा वेग मात्र मंदावला आहे.

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत रस्ता बांधकाम, रोपे लागवड, विहिरींची कामे केली जात आहेत. प्रत्येक तालुक्याला कामांचे उद्दीष्ट दिले असून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीदेखील कामे अपूर्ण राहण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारचे इतर विभाग व ग्रामपंचायत मिळून जवळपास २२ हजार ३०२ कामे अपूर्ण राहिली आहेत. राज्य यंत्रणेची दहा हजार तर ग्रामपंचायतींमध्ये २९ हजार ३९४ कामे सुरू असून त्यापैकी १२ हजार १३७ कामे अपूर्ण आहेत. कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक १ हजार ५९० कामे अपूर्ण आहेत. त्यानंतर पाथर्डी (१ हजार ३९० कामे), संगमनेर (१ हजार २०५) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेऊन कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जात असल्या तरी कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी अपूर्ण कामांचा ताण वाढत जात असल्याचा अधिकाऱ्यांचा अनुभव आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज