अ‍ॅपशहर

कांदा चाळीसाठी ३३ हजार अर्ज

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. या योजनेत जिल्हाभरातील तब्बल ३३ हजार ६२५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले आहे.

Maharashtra Times 16 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 33 thousand applications for onion chali
कांदा चाळीसाठी ३३ हजार अर्ज

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. या योजनेत जिल्हाभरातील तब्बल ३३ हजार ६२५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले आहे. या अर्जांतून लाभार्थ्यांची निवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून सोमवारपासून तालुकास्तरावर सोडत काढली जाणार आहे. या योजनेत २५ टन कांदा साठवणूक क्षमतेच्या कांदा चाळीस ८७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. योजनेसाठी ७ कोटी ८७ लाख रुपये अनुदान मिळाले आहे.
जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे कांद्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची कांदा चाळीस मागणी असते. यंदाच्या खरिपातही कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तसेच रब्बी हंगामात कांद्याच्या लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. कांद्याची साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ उभारण्याची तयारी केली जात आहे. कांदा चाळीसाठी कृषी विभागाकडून अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्यातून ३३ हजार अर्ज मिळाले आहे. या अर्जांतून लाभार्थी निवडले जाणार आहेत. यासाठी तालुकास्तरावरील कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारपासून सोडतीस सुरुवात होणार आहे.
या सोडतीनंतर लाभार्थ्यांच्या ज्येष्ठता याद्या तयार केल्या जाणार आहेत. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी लाभार्थींना निवडीचे पत्र देतील. पत्र मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी दहा दिवसांच्या आत प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करुन प्रशासकीय मंजुरी घ्यायची आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी प्रकल्पाची उभारणी करायची आहे, असे जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज