अ‍ॅपशहर

अवघी ३९ विकासकामे पूर्ण

आदिवासी भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी थेट उपलब्ध करुन दिल्यानंतरही कामे वेळत पूर्ण करण्यात ग्रामपंचायतींना अपयश येत आहे.

Maharashtra Times 6 Nov 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 39 project done
अवघी ३९ विकासकामे पूर्ण

आदिवासी भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी थेट उपलब्ध करुन दिल्यानंतरही कामे वेळत पूर्ण करण्यात ग्रामपंचायतींना अपयश येत आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी भागात वर्षअखेरीस अवघी ३९ कामे पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. ग्रामपंचायतींकडून कामांचे आराखडे वेळेत सादर न करणे, कामास उशीराने झालेली सुरुवात यामुळे कामे पूर्ण होत नसल्याने निधी असतानाही गावे मात्र विकासापासून वंचित राहत आहेत. दरम्यान, मागील वर्षातील जवळपास सव्वा दोनशे अपूर्ण कामांबरोबरच चालू वर्षातील कामे पूर्ण करुन घेण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे.
पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम ‘पेसा’ कायद्यांतर्गत अकोले तालुक्यातील ९४ गावे येतात. या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून थेट पाच टक्के निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा केला जातो. या निधीतून गावात कोणती विकासकामे करायची हे ठरवण्याचा अधिकारही ग्रामपंचायतींनाच दिला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेस हस्तक्षेप करता येत नसला तरी कामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. असे असले तरी ग्रामपंचायतींकडून कामे वेळेत पूर्ण करण्यात दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषदेने मागणी केल्यानंतरही ग्रामपंचायतींनी आराखडे सादर केले नाहीत. त्यामुळे कामांच्या मान्यता रखडल्या. या कारणांमुळे वर्षभरात कामे पूर्ण करता आली नाहीत. कामांच्या आराखड्यांबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आराखडे सादर झाले आहेत. त्यामुळे आता पुढील वर्षभरात अपूर्ण कामे पूर्ण करुन घेणे आवश्यक असले तरी कामांचा वेग पाहता कामे पूर्ण होतील याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज