अ‍ॅपशहर

४० जण पुराच्या पाण्यात अडकले

नगर तालुक्यातील अरणगाव येथील तलाव फुटल्याने वाळुंज येथील परिट वस्तीतील ४० जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत़. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर पाटील, पोलीस पथक, आर्मी पथक घटनास्थळी दाखल झाले़. रात्री उशिरापर्यंत पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

Maharashtra Times 20 Sep 2017, 11:06 pm
अहमदनगर : नगर तालुक्यातील अरणगाव येथील तलाव फुटल्याने वाळुंज येथील परिट वस्तीतील ४० जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत़. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर पाटील, पोलीस पथक, आर्मी पथक घटनास्थळी दाखल झाले़. रात्री उशिरापर्यंत पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. घटनेचे गांभीर्य पाहून पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले मात्र रात्री उशिरापर्यंत हे पथक दाखल न झाल्याने ग्रामस्थ पाण्यातच अडकून पडले होते़.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 40 villagers trapped in flood water in ahmednagar district
४० जण पुराच्या पाण्यात अडकले


सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने तलाव ओव्हरफ्लो झाला तसेच वस्तीच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिल्याने ग्रामस्थांना बाहेर पडता आले नाही़. त्यातच तलावाचे पाणीही वस्तीपर्यंत पोहोचल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे काही ग्रामस्थ उंचावर तर काहींना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर पाटील घटनास्थळी दाखल झाले़ मात्र ग्रामस्थ ४०० ते ५०० मीटर अंतरावरील पाण्यात अडकल्याने तिथपर्यंत पथकाला पोहोचता येत नव्हते़. त्यामुळे आर्मी पथकाला बोलविण्यात आले़. सायंकाळी ४० सैनिकांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली मात्र त्यांनाही वस्तीपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही़. त्यामुळे रात्री दहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले होते़.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज