अ‍ॅपशहर

राहुरीत जीप झाडावर आदळून आठ ठार

नगर-मनमाड रस्त्यावर राहुरी शहराजवळ भरधाव वेगाने जाणारी जीप झाडावर आदळून आठ जण ठार झाले. सर्व जण राहुरी तालुक्यातील वळण व वरवंडी गावचे शेतकरी कुटुंबातील आहेत. एका कार्यक्रमाहून परत असताना राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान हा अपघात झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2017, 8:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahuri-accident


नगर-मनमाड रस्त्यावर राहुरी शहराजवळ भरधाव वेगाने जाणारी जीप झाडावर आदळून आठ जण ठार झाले. सर्व जण राहुरी तालुक्यातील वळण व वरवंडी गावचे शेतकरी कुटुंबातील आहेत. एका कार्यक्रमाहून परत असताना राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान हा अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शंनी दिलेल्या माहितीनुसार जीप भरधाव वेगात होती. चालकाचा ताबा सुटून ती झाडावर आदळली आणि नंतर तीन-चार पलट्या घेत रस्त्याच्या खाली गेली. यामध्ये जीपमधील सर्वच्या सर्व आठ जण ठार झाले. नाथा डमाळे, महेश कोळसे, महेश पवार, सुरेश खुळे, अरुण थोरात, सतीश शेळके हे जागीच ठार झाले. अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज