अ‍ॅपशहर

उद्योगांची ८३ प्रकरणे मंजूर

केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग व्यवसायाच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील ९१९ उमेदवारांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज सादर केले.

Maharashtra Times 11 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 83 cases of industries approved
उद्योगांची ८३ प्रकरणे मंजूर

केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग व्यवसायाच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील ९१९ उमेदवारांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज सादर केले. केंद्राने यातील ४०२ अर्ज बँकांकडे पाठवल्यानंतर यातील ८३ अर्ज बँकांनी मंजूर केले आहेत. उर्वरीत ३१९ अर्ज अजूनही बँकांकडे धूळखात पडले आहेत.
केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेत उद्योग केंद्राकडून जास्तीत जास्त पंचवीस लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेस जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून नऊशे जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यातील चारशे अर्ज केंद्राने राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठवल्यानंतर बँकांनी ८३ अर्ज मंजूर केले आहेत. या उमेदवारांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. उर्वरीत ३१९ अर्ज अजूनही प्रलंबित असून या अर्जांचे काय होणार याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. चालू आर्थिक वर्षातही २२७ अर्ज केंद्राला प्राप्त झाले असले तरी उद्दीष्ट मात्र घटले आहे. मागील वर्षात १ कोटी ९२ लाखांच्या अनुदान वाटपाचे उद्दीष्ट होते. या वेळी मात्र ८४ लाखाचेच उद्दीष्ट मिळाले आहे. अर्जांची संख्या वाढत असल्याने अनुदान मात्र कमी होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज