अ‍ॅपशहर

‘आरोपींना फाशी व्हावी एवढीच इच्छा’

‘आरोपींना दोषी ठरवल्यामुळे आता छकुलीला न्याय मिळेल. आरोपींना फाशी व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे,’ अशा भावना व्यक्त करताना पीडितेच्या आईला अश्रू अनावर झाले.

Maharashtra Times 19 Nov 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accused should get capital punishment
‘आरोपींना फाशी व्हावी एवढीच इच्छा’


‘आरोपींना दोषी ठरवल्यामुळे आता छकुलीला न्याय मिळेल. आरोपींना फाशी व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे,’ अशा भावना व्यक्त करताना पीडितेच्या आईला अश्रू अनावर झाले.
निकाल ऐकण्यासाठी पीडितेची आई, वडिल, भाऊ यांच्यासह कोपर्डीचे ग्रामस्थ न्यायालयामध्ये आले होते. न्यायालयाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर मुख्य इमारतीकडे जाताना पीडितेची आई व ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. मुख्य इमारतीची पायरी चढण्यापूर्वीच त्यांना न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवल्याची माहिती मिळाली.
‘आरोपींना दोषी ठरवल्याने न्याय मिळाला वाटते. पण या तिघांना फाशी होण्याची गरज आहे. अॅड.उज्ज्वल निकम यांचे खूप आभारी आहे. सरकार व समाजाचे सुद्धा सहकार्य आम्हाला मिळाले. आता फक्त २१ नोव्हेंबरची प्रतीक्षा आहे,’ असेही पीडितेच्या आईने सांगितले. तर, ‘घटना घडल्यानंतर समाज बांधव, सरकार या सर्वांनी आतापर्यंत खूप साथ दिली आहे. तिन्ही आरोपींना फाशी व्हावी. जेव्हा शिक्षेची सुनावणी होईल, तेव्हाच माझ्या मुलीला न्याय मिळाला का नाही, हे सांगता येईल,’ अशा भावना पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज