मटा ऑनलाइन वृत्त। अहमदनगर
अहमदनगर जवळच असलेल्या निंबोडी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १६ विद्यार्थ्यांसह एक शिक्षकही जखमी झाले आहेत. पैकी एक विद्यार्थी अत्यवस्थ असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली सुमारे २० ते २५ विद्यार्थी दबले गेले होते. शाळा सुटल्यानंतर काही मिनिटांतच ही दुर्दैवी घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांना अहमदनगर शहरातील सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलंय.
निंबोडी प्राथमिक शाळेत एकूण ३५ विद्यार्थी होते. शाळा सुटल्यानंतर काही मुलं शाळेबाहेर गेली, तर काही मुलं मात्र आतच थांबली होती. मात्र कुणालाही काही कळायच्या आत अचानक शाळेचं छत आणि भिंती कोसळल्या. यात १० ते १५ मुलं अडकली. शाळा कोसळली अशी बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तातडीनं गावकरी शाळेभोवती गोळा झाले. त्यानंतर चक्र हलली. निंबोडीला तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शाळेच्या बांधकामाची तपासणी करणार
अहमदनगर जिल्ह्यातील सन २००० पूर्वीच्या सर्व शाळांच्या बांधकामाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून तपासणी करुन घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबरोबर हे काम तत्काळ सुरू करावे असे आदेश सीईओ विश्वजीत माने यांनी दिले आहेत.
अहमदनगर जवळच असलेल्या निंबोडी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १६ विद्यार्थ्यांसह एक शिक्षकही जखमी झाले आहेत. पैकी एक विद्यार्थी अत्यवस्थ असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली सुमारे २० ते २५ विद्यार्थी दबले गेले होते. शाळा सुटल्यानंतर काही मिनिटांतच ही दुर्दैवी घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांना अहमदनगर शहरातील सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलंय.
निंबोडी प्राथमिक शाळेत एकूण ३५ विद्यार्थी होते. शाळा सुटल्यानंतर काही मुलं शाळेबाहेर गेली, तर काही मुलं मात्र आतच थांबली होती. मात्र कुणालाही काही कळायच्या आत अचानक शाळेचं छत आणि भिंती कोसळल्या. यात १० ते १५ मुलं अडकली. शाळा कोसळली अशी बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तातडीनं गावकरी शाळेभोवती गोळा झाले. त्यानंतर चक्र हलली. निंबोडीला तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शाळेच्या बांधकामाची तपासणी करणार
अहमदनगर जिल्ह्यातील सन २००० पूर्वीच्या सर्व शाळांच्या बांधकामाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून तपासणी करुन घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबरोबर हे काम तत्काळ सुरू करावे असे आदेश सीईओ विश्वजीत माने यांनी दिले आहेत.