विजयसिंह होलम । अहमदनगर केस कापण्यासाठी सलूनमध्ये नंबर लावण्यावरून नगर शहरातील पीरशहा खुंट भागात सोमवारी रात्री दोन गटांत वाद झाला. दोन्ही बाजूंनी मोठा जमाव जमला होता. आपसांत मारामारी करताना वाहनांवर दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या संवेदनशील भागातील पुढील अनर्थ टळला. यामध्ये चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
वाचा: करोनाने चिंता वाढवली! नाशिकच्या केबीएच दंत महाविद्यालयात एकाच वेळी...
यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, रविवारी पीरशहा खूंट येथील एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी आलेल्या दोघांचा नंबरवरून वाद झाला. त्यावेळी तो तात्पुरता मिटला होता. मात्र, सोमवारी रात्री चौकात आलेल्या त्या दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. काही वेळातच तो वाढत गेला. दोन्ही बाजूंनी जमाव जमला आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेला. बाचाबाची सुरू असताना बाजूला उभ्या असलेल्या काही वाहनांवरही दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले. हा भाग आधीच संवेदनशील मानला जातो. रात्री नऊनंतर जमावबंदी असतानाही येथे लोक जमले होते. पीरशहा खुंटावर गर्दी जमून मारामारी सुरू झाल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांनी फौजफाट्यासह तेथे धाव घेतली. पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे हेही घटनास्थळी आले. जास्तीचा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी गर्दी पांगविली. मारामारी करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आली. तोपर्यंत या घटनेची माहिती शहरभर पसरली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर शहरात गस्त ठेवली. किरकोळ कारणातून ही घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी तत्परते कारवाई केली केल्याने पुढील अनर्थ टळला.
वाचा: धक्कादायक! १६ वर्षांच्या मुलाला कोवॅक्सीन ऐवजी कोविशील्डची लस दिली आणि...
वाचा: करोनाने चिंता वाढवली! नाशिकच्या केबीएच दंत महाविद्यालयात एकाच वेळी...
यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, रविवारी पीरशहा खूंट येथील एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी आलेल्या दोघांचा नंबरवरून वाद झाला. त्यावेळी तो तात्पुरता मिटला होता. मात्र, सोमवारी रात्री चौकात आलेल्या त्या दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. काही वेळातच तो वाढत गेला. दोन्ही बाजूंनी जमाव जमला आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेला. बाचाबाची सुरू असताना बाजूला उभ्या असलेल्या काही वाहनांवरही दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले. हा भाग आधीच संवेदनशील मानला जातो. रात्री नऊनंतर जमावबंदी असतानाही येथे लोक जमले होते. पीरशहा खुंटावर गर्दी जमून मारामारी सुरू झाल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांनी फौजफाट्यासह तेथे धाव घेतली. पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे हेही घटनास्थळी आले. जास्तीचा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी गर्दी पांगविली. मारामारी करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आली. तोपर्यंत या घटनेची माहिती शहरभर पसरली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर शहरात गस्त ठेवली. किरकोळ कारणातून ही घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी तत्परते कारवाई केली केल्याने पुढील अनर्थ टळला.
वाचा: धक्कादायक! १६ वर्षांच्या मुलाला कोवॅक्सीन ऐवजी कोविशील्डची लस दिली आणि...