अ‍ॅपशहर

पतीसोबत वाद झाल्यानं चार मुलांसह तिनं घर सोडलं आणि...

अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात एका इसमानं त्याची पत्नी व चार मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. (Man Files Missing Complaint At Topkhana Police Station)

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2021, 4:41 pm
अहमदनगर: आईसह चार मुले बेपत्ता झाल्याची घटना सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेब गणपत पानसरे (वय ४५) यांनी ही तक्रार दिली आहे. (Man Files Missing Complaint At Topkhana Police Station)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Crime


वाचा: आधी वडील आणि आजोबांचा खून केला, मग तरुणाने...

बाळासाहेब पानसरे यांची पत्नी पल्लवी पानसरे (वय ३६), मुलगी वैष्णवी पानसरे (वय १८), वैभवी पानसरे (वय १८), सोनल पानसरे (वय १७) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. ३ फेब्रुवारीला सकाळी बाळासाहेब यांचे पत्नी पल्लवी सोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यानंतर पल्लवी आपल्या चार मुलांना घेऊन शिक्रापूर (जि. पुणे) येथे बाळासाहेब यांच्या साडूची मुलगी प्रिती जाधव यांचेकडे गेली. यानंतर बाळासाहेब यांचे साडू विजय भगत यांनी बाळासाहेब यांना फोन करून सांगितले की, पल्लवीने सोशल मीडियावर मी आत्महत्या करीत आहे, असा मेसेज पाठवला आहे. यानंतर पत्नी पल्लवीसोबत संपर्क झाला नसल्याने बाळासाहेब यांनी पत्नी व मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

वाचा: 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होताच सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत कसे?'
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज