अ‍ॅपशहर

दारू पिऊ नको सांगितलं म्हणून वडिलांचा खून

दारूचं व्यसन सोडवण्यासाठी मुलाला सतत समजावणाऱ्या एका इसमाचा त्याच्या मुलानं खून केल्याची घटना नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2020, 12:28 pm
अहमदनगर: दारू पिऊ नको म्हणून सतत समजावणाऱ्या वडिलांचा राग आल्याने मुलाने त्यांचा खून केला. ७० वर्षीय वडिलांना त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील बोरी येथे ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Arrest


करोना Live: राज्यातील रुग्णसंख्या ३३ हजार पार

भागवत गोमा कांबळे (वय ७०) असं मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी राजेंद्र कांबळे याला अटक केली आहे. त्याच्या मुलीनेच वडिलांनी आजोबाचा खून केल्याची फिर्याद पोलिसांत दिली आहे. बोरी गावात राहणारा राजेंद्र कांबळेला दारूचे व्यसन आहे. लॉकडाउनच्या काळात बंद झालेली दारू पुन्हा सुरू झाल्याने त्याचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली. त्याचे व्यसन सुटावे म्हणून वडील वारंवार समजावून सांगत असत. याचा राग आल्याने राजेंद्र याने वडिलांवरच हल्ला चढविला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या मानेवर, डोक्यावर, छातीवर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज