अ‍ॅपशहर

विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने जिल्हाधिकारी कार्यालयातच घेतलं विष

Ahmednagar News : विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, कुटुंबाकडून दोघांनाही त्रास दिला जात असल्याची तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न श्रीगोंदा तालुक्यातील घोटी येथील सरपंच अविनाश चव्हाण याने केला आहे. ही घटना काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2022, 2:20 pm
अहमदनगर : विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, कुटुंबाकडून दोघांनाही त्रास दिला जात असल्याची तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न श्रीगोंदा तालुक्यातील घोटी येथील सरपंच अविनाश चव्हाण याने केला आहे. ही घटना काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar Sarpanch Takes Poison
विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने जिल्हाधिकारी कार्यालयातच घेतलं विष


श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावात निवडणुका झाल्यानंतर अविनाश चव्हाण हा या गावाचा सरपंच झाला. त्यानंतर त्याचं गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. या प्रकरणाची गावात कुणकुण लागल्यानंतर विवाहितेच्या पतीने आणि त्याच्या घरच्यांनी याला विरोध केला. संबंधित महिलेला पतीन माहेरी पाठवून दिले. माहेरी गेल्यानंतर आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार महिलेने प्रेम सरपंच चव्हाण याच्याकडे केली. त्यानंतर त्याने आमच्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, आम्हाला त्रास देत असल्याची तक्रार करण्यासाठी सरपंच अविनाश चव्हाण याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!
जिल्ह्याधिकाऱ्यांना अविनाश चव्हाण याने एक पत्र लिहिले. "आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आम्हाला सोबत राहू देत नाही", असं म्हणत अविनाशने कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्याला स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी पोलीस प्रशासन पुढचा तपास करत आहेत.

महत्वाचे लेख