अ‍ॅपशहर

अहमदनगरमध्ये पाणीपुरीत निघाल्या जीवंत अळ्या

अहमदनगर येथे पाणीपुरीसाठीच्या पाण्यात जीवंत आळ्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्राहकामुळे ही बाब उघडकीस आल्यानंतर पाणीपुरीसाठीचं हे पाणी फेकून देण्यात आलं आहे. तर ग्राहकांचा चोप बसण्याच्या भीतीने या पाणीपुरीवाल्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2019, 5:10 pm
अहमदनगर: अहमदनगर येथे पाणीपुरीसाठीच्या पाण्यात जीवंत आळ्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्राहकामुळे ही बाब उघडकीस आल्यानंतर पाणीपुरीसाठीचं हे पाणी फेकून देण्यात आलं आहे. तर ग्राहकांचा चोप बसण्याच्या भीतीने या पाणीपुरीवाल्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paanipuri


नगरच्या नेप्ती चौकात एका पाणीपुरीच्या ठेल्यावर शनिवारी हा प्रकार घडला. एका ग्राहकामुळे ही बाब उघडकीस आली. पाणीपुरी विक्रेत्याने हे पाणी दोन-तीन दिवसाचे असल्याचं सांगत त्याची कबुली दिली. मात्र या प्रकाराला ज्या दुकानातून पाणीपुरीचा मसाला घेतला तो दुकानदारच जबाबदार असल्याचं स्पष्ट केलं.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शनिवारी नगरच्या नेप्ती चौकात घेण्यात आला आहे. तेथे लागणाऱ्या 'जय भोलेनाथ पाणीपुरी सेंटर' असे नाव असलेल्या ठेल्यावर हा प्रकार घडला. पाणीपुरीसोबत देण्यात येणाऱ्या तिखट पाण्यात अळ्या वळवळत असल्याचे काही तरुणांनी पाहिले. त्यांनी त्याचे चित्रिकरण सुरू केले. विक्रेत्याला अळ्या दाखविल्या. अळ्या पाहून विक्रेत्याची बोलती बंद झाली. दोन तीन दिवसांचे हे पाणी असल्याचे मान्य करून त्याने ते तेथील चेंबरमध्ये ओतून दिले. शेवटी राहिलेल्या मसाल्यातही अळ्या दिसत होत्या. आपली चूक मान्य करताना आपण जेथून मसाला आणतो, त्यातच अळ्या असतील, असेही तो सांगून मोकळा झाला. तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याने तेथून पळ काढला. यासंबंधी अद्याप कोठेही तक्रार दाखल झाली नव्हती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज