म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी
आपल्या पिकाला भाववाढ मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावरून आपण सत्ताधाऱ्यांना जाब विचारू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पवार यांनी गुरुवारी तालुक्यातील घोटण व खानापूर येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन बुधवारी झालेल्या गोळीबाराची माहिती घेतली. या वेळी त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या उपचाराचा खर्च करणार असल्याचे जाहीर केले. पवार यांनी खानापूर येथील जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नगर येथे दवाखान्यात जाऊन भेट घेतली. त्या नंतर ते घोटन व खानापूर येथे आले. या वेळी त्यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप, नगरसेवक सागर फडके, काकासाहेब नरवडे, कल्याण नेमाणे आदी उपस्थित होते,
पवार म्हणाले की, विरोधात असताना आजचे सत्ताधारी शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव देऊ, असे सांगून सत्तेत आले; मात्र, त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. कापूस, ऊस, मूग, उडीद या पिकांना भाव नसून या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या उसाला भाव मिळावा यासाठी आंदोलन केले; मात्र, त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्याच्यावर अश्रुधूर सोडला, गोळीबारही केला. ज्या अधिकाऱ्याने गोळीबार केला त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण अधिवेशनात करणार असून युतीचे सरकार सत्तेत यावे यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले; मात्र, शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचे काम या सरकारने केले असून सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात फूट पडून शेतकऱ्यांमध्ये एकी होऊ दिली नाही. या सरकारच्या काळात दुधाला १७ रुपये तर पाण्याच्या बाटलीला २० रुपये मोजावे लागत आहेत. बुधवारी झालेल्या गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री व सहकारमंत्री काहीच का बोलत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस घेताना खासगी कारखानदार काटा मारण्याचा उद्योग करतात तो थांबला पाहिजे. या प्रश्नावर राजकारण करायचे नसून शेतकरी हीच आपली जात आहे. या घटनेतील शेतकऱ्यांचा दवाखान्यातील खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आपल्या पिकाला भाववाढ मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावरून आपण सत्ताधाऱ्यांना जाब विचारू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पवार यांनी गुरुवारी तालुक्यातील घोटण व खानापूर येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन बुधवारी झालेल्या गोळीबाराची माहिती घेतली. या वेळी त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या उपचाराचा खर्च करणार असल्याचे जाहीर केले. पवार यांनी खानापूर येथील जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नगर येथे दवाखान्यात जाऊन भेट घेतली. त्या नंतर ते घोटन व खानापूर येथे आले. या वेळी त्यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप, नगरसेवक सागर फडके, काकासाहेब नरवडे, कल्याण नेमाणे आदी उपस्थित होते,
पवार म्हणाले की, विरोधात असताना आजचे सत्ताधारी शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव देऊ, असे सांगून सत्तेत आले; मात्र, त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. कापूस, ऊस, मूग, उडीद या पिकांना भाव नसून या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या उसाला भाव मिळावा यासाठी आंदोलन केले; मात्र, त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्याच्यावर अश्रुधूर सोडला, गोळीबारही केला. ज्या अधिकाऱ्याने गोळीबार केला त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण अधिवेशनात करणार असून युतीचे सरकार सत्तेत यावे यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले; मात्र, शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचे काम या सरकारने केले असून सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात फूट पडून शेतकऱ्यांमध्ये एकी होऊ दिली नाही. या सरकारच्या काळात दुधाला १७ रुपये तर पाण्याच्या बाटलीला २० रुपये मोजावे लागत आहेत. बुधवारी झालेल्या गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री व सहकारमंत्री काहीच का बोलत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस घेताना खासगी कारखानदार काटा मारण्याचा उद्योग करतात तो थांबला पाहिजे. या प्रश्नावर राजकारण करायचे नसून शेतकरी हीच आपली जात आहे. या घटनेतील शेतकऱ्यांचा दवाखान्यातील खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.