अ‍ॅपशहर

ajit pawar : कुणी तरी बाहेर येतो, अन् भोंगे बंद करा म्हणतो : अजितदादांकडून नाव न घेता राज ठाकरेंचा समाचार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणावरून अजित पवारांनी टीका केली आहे. कोपरगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाचे मुद्दे सोडून हे भलतेच मुद्दे आणले जात असल्याचे अजित पवार म्हणाले.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स 6 Apr 2022, 2:23 pm
अहमदनगर : 'सध्या राजकारण बदलत आहे. विकासापेक्षा वेगळ्या गोष्टी पुढे आणून समाजमन विचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणी तरी अचानक झोपेतून जागा होऊन बाहेर येतो आणि भोंगे बंद करा म्हणतो,' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार ( ajit pawar slams raj thackeray ) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून समाचार घेतला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit pawar slams raj thackeray
कुणी तरी बाहेर येतो, अन् भोंगे बंद करा म्हणतो : अजितदादांकडून नाव न घेता राज ठाकरेंचा समाचार


कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याह पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

आमदार काळे यांच्या कामाचे आणि महाविकास आघाडीच्या कामाचे कौतुक केल्यानंतर पवार यांनी विकास कामात येत असलेल्या अडथळ्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणासंबंधी त्यांनी भाष्य केले. सरकारने मशिदीवरील आजानचे भोंगे काढावेत, अन्यथा आम्ही तेथे दुप्पट आवाजात हनुमान चालिका लावू, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

यासंबंधी ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, ‘आम्ही विकास कामाला प्राधान्य देत राजकारण करतो. त्यामुळे किती लाटा आल्या आणि गेल्या तरीही आम्ही टिकून आहोत. अलीकडे कुणी तरी बाहेर येतो आणि भोंगे बंद करा म्हणतो. त्यांना हे आताच का सूचले? यापूर्वी सरकारमध्ये त्यांचे कोणी नव्हते का? तेव्हा झोपले होते का? विकासाचे मुद्दे सोडून हे भलतेच मुद्दे जाणीवपूर्वक आणले जात आहेत. आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. एकमेकांच्या सणांना आवर्जून शुभेच्छा देतात, ही आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच शिकवण आपल्याला दिली आहे.

'आरं भाषण करणं सोपंय बाबा', अजित पवार यांची राज ठाकरेंवर पुन्हा सडकून टीका

फुले,शाहू,आंबेडकरांनी हीच परंपरा पुढे चालविली. आता आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही आम्ही वेगवेगळ्या विचारांचे लोक आहोत. मात्र, केवळ विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. हे सरकार टिकणार की नाही, अशी शंका वेळोवेळी उपस्थित केली गेली. मात्र, आम्ही ठाम आहोत. जगात सध्या काय सुरू आहे पहा. श्रीलंकेत तिकडे रशिया-युक्रेनमध्ये काय सुरू आहे पहा. असे प्रकार आपल्याकडे होऊ द्यायचे नाहीत. यासाठी आपण सर्वांनी जागरुकपणे याकडे पाहिले पाहिजे. राजकारण निवडणुकीपुरते असावे. निवडणुकीत चांगल्या विचारांचे लोक निवडून द्यावेत. त्यानंतर राजकारण विसरून विकासासाठी ठामपणे उभे राहावे,’ असे आवाहनही पवार यांनी केले.

Hanuman Chalis:...तर मुश्रीफ यांच्यासमोर हनुमान चालिसा लावणार; मनसेचा इशारा
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख