अहमदनगर: कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथील अंगणवाडी सेविका उज्ज्वला संदीप जाधव (वय २४), त्यांची मुले राजवीर (वय ५) व उत्कर्षा (वय ८ महिने) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तिघांचे मृतदेह घरात आढळून आले. त्यांचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने पोलिसांनी जाधव यांच्या पतीसह सासरच्या मंडळींना ताब्यात घेतले आहे.
जाधव आपल्या कुटुंबांसह झिनेवाडीत राहतात. बुधवारी सकाळी त्यांचा घरात गळफास लावलेल्या अवस्थेत तर, मुलांचे मृतदेह पलंगावर आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात आणले. मात्र, हे प्रकरण संशयास्पद असून उज्ज्वला यांचा पती आणि सासूने खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली. त्यामुळे मृतदेह तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, उज्ज्वला यांचा पती संदीप, सासू-सासरे आणि अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जाधव आपल्या कुटुंबांसह झिनेवाडीत राहतात. बुधवारी सकाळी त्यांचा घरात गळफास लावलेल्या अवस्थेत तर, मुलांचे मृतदेह पलंगावर आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात आणले. मात्र, हे प्रकरण संशयास्पद असून उज्ज्वला यांचा पती आणि सासूने खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली. त्यामुळे मृतदेह तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, उज्ज्वला यांचा पती संदीप, सासू-सासरे आणि अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.