म. टा. प्रतिनिधी, नगर
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपाच्या पाचव्या दिवशी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत थाळीनाद आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात सरकारने वाढ करावी तसेच अंगणवाड्यांतून दिला जाणारा टीएचआर (टेक होम रेशन) आहार बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविकांनी केलेल्या थाळीनादाने जिल्हा परिषद दणाणून गेली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत राज्य सरकारने जून २०१६ मध्ये समिती नियुक्त केली होती. समितीने अहवाल सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी थाळीनाद आंदोलन करत सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. मानधनात वाढ करण्याबरोबरच अंगणवाड्यातून दिला जाणारा टीएचआर बंद करावा, लाभार्थ्यांच्या पूरक पोषक आहाराच्या निधीत वाढ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्याध्यक्ष मंगला सराफ, शांता गोरे, सुनिता कुलकर्णी, सुरेखा विखे, विजया घोडके आदींसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपाच्या पाचव्या दिवशी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत थाळीनाद आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात सरकारने वाढ करावी तसेच अंगणवाड्यांतून दिला जाणारा टीएचआर (टेक होम रेशन) आहार बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविकांनी केलेल्या थाळीनादाने जिल्हा परिषद दणाणून गेली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत राज्य सरकारने जून २०१६ मध्ये समिती नियुक्त केली होती. समितीने अहवाल सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी थाळीनाद आंदोलन करत सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. मानधनात वाढ करण्याबरोबरच अंगणवाड्यातून दिला जाणारा टीएचआर बंद करावा, लाभार्थ्यांच्या पूरक पोषक आहाराच्या निधीत वाढ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्याध्यक्ष मंगला सराफ, शांता गोरे, सुनिता कुलकर्णी, सुरेखा विखे, विजया घोडके आदींसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.