म.टा.प्रतिनिधी,नगर
लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यासाठी कार्यकर्त्यांची नवी टीम बांधण्यास सुरवात केली आहे. देशभरातील निवडक कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे शिबीर राळेगणसिद्धी येथे शनिवारी सुरू झाले. आंदोलन करण्यावर हे सर्व जण ठाम असून आंदोलनाचे स्वरुप आणि ठिकाण यावर रविवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
सप्टेंबर महिन्यात हजारे यांनी आंदोलनाचे सुतोवाच केले होते. त्यानुसार हे दोन दिवसांचे शिबीर घेण्यात येत आहे. देशातील विविध राज्यांतून सुमारे पन्नास कार्यकर्त्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यातील बहुतांश जुने सर्वसामान्य कार्यकर्ते असून काहींचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, पूर्वीच्या आंदोलनांत अग्रभागी असलेल्यांपैकी फारसे कार्यकर्ते या बैठकीला नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांमधूनच नव्या टीमची बांधणी सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. यातील अनेक कार्यकर्ते प्रथमच हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत.
शनिवारी दिवसभर आंदोलनाचे विषय, स्वरुप, ठिकाण यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर आंदोलन व्हावे अशा सूचना यावेळी आल्या. आंदोलन दिल्लीत किंवा राळेगणसिद्धी येथे करावे, अशी वेगवेगळी मतेही मांडली गेली.
यावेळी बोलताना हजारे म्हणाले, ‘नवे सरकार सत्तेवर आले असले तरी गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचार कमी झालेला नाही. सामान्य माणसाला त्याचा त्रास होत आहेच. भ्रष्टाचारमुक्त भारत हे आपले स्वप्न असून त्यासाठी लढा सुरूच राहिल. केंद्र सरकारला आपण तीन वर्षांत अनेक पत्रे लिहिली, या प्रश्नाची जाणीव करून दिली. मात्र, सरकारने त्याची दखल घेतली नाही. यावरून असे दिसते की लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची अजिबात इच्छा दिसत नाही. त्यामुळेच आपण सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.’
सर्वोदयचे प्रमुख अमरनाथ भाई यांचेही यावेळी भाषण झाले. जयप्रकाश नारायण यांच्यानंतर देशातील जनतेला आता केवळ अण्णांकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे उपाध्यक्ष प्रा. बालाजी कोंपलवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्गदर्शन केले. कर्नल दिनेश नैन, विनायक पाटील, मनिंद्र जैन, कल्की, करनवीर, सुनिल लाल यांनी चर्चेत भाग घेतला. अशोक सब्बन यांनी प्रास्ताविक केले तर अल्लाउद्दीन शेख यांनी आभार मानले. राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उडिसा, कर्नाटक, तेलंगना, मध्य प्रदेश, हरियाना, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांमधील प्रमुख कार्यकर्ते शिबिरासाठी उपस्थित आहेत.
लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यासाठी कार्यकर्त्यांची नवी टीम बांधण्यास सुरवात केली आहे. देशभरातील निवडक कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे शिबीर राळेगणसिद्धी येथे शनिवारी सुरू झाले. आंदोलन करण्यावर हे सर्व जण ठाम असून आंदोलनाचे स्वरुप आणि ठिकाण यावर रविवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
सप्टेंबर महिन्यात हजारे यांनी आंदोलनाचे सुतोवाच केले होते. त्यानुसार हे दोन दिवसांचे शिबीर घेण्यात येत आहे. देशातील विविध राज्यांतून सुमारे पन्नास कार्यकर्त्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यातील बहुतांश जुने सर्वसामान्य कार्यकर्ते असून काहींचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, पूर्वीच्या आंदोलनांत अग्रभागी असलेल्यांपैकी फारसे कार्यकर्ते या बैठकीला नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांमधूनच नव्या टीमची बांधणी सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. यातील अनेक कार्यकर्ते प्रथमच हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत.
शनिवारी दिवसभर आंदोलनाचे विषय, स्वरुप, ठिकाण यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर आंदोलन व्हावे अशा सूचना यावेळी आल्या. आंदोलन दिल्लीत किंवा राळेगणसिद्धी येथे करावे, अशी वेगवेगळी मतेही मांडली गेली.
यावेळी बोलताना हजारे म्हणाले, ‘नवे सरकार सत्तेवर आले असले तरी गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचार कमी झालेला नाही. सामान्य माणसाला त्याचा त्रास होत आहेच. भ्रष्टाचारमुक्त भारत हे आपले स्वप्न असून त्यासाठी लढा सुरूच राहिल. केंद्र सरकारला आपण तीन वर्षांत अनेक पत्रे लिहिली, या प्रश्नाची जाणीव करून दिली. मात्र, सरकारने त्याची दखल घेतली नाही. यावरून असे दिसते की लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची अजिबात इच्छा दिसत नाही. त्यामुळेच आपण सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.’
सर्वोदयचे प्रमुख अमरनाथ भाई यांचेही यावेळी भाषण झाले. जयप्रकाश नारायण यांच्यानंतर देशातील जनतेला आता केवळ अण्णांकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे उपाध्यक्ष प्रा. बालाजी कोंपलवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्गदर्शन केले. कर्नल दिनेश नैन, विनायक पाटील, मनिंद्र जैन, कल्की, करनवीर, सुनिल लाल यांनी चर्चेत भाग घेतला. अशोक सब्बन यांनी प्रास्ताविक केले तर अल्लाउद्दीन शेख यांनी आभार मानले. राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उडिसा, कर्नाटक, तेलंगना, मध्य प्रदेश, हरियाना, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांमधील प्रमुख कार्यकर्ते शिबिरासाठी उपस्थित आहेत.