अ‍ॅपशहर

अण्णा हजारे यांनी साधला केजरीवालांवर निशाणा!

ईव्हीएम मशीनच्या वापरावर राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता ईव्हीएम मशीनच्या वादात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली असून त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Times 15 Mar 2017, 9:45 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna hazare not happy with arvind kejriwals demand to return to paper ballot
अण्णा हजारे यांनी साधला केजरीवालांवर निशाणा!


ईव्हीएम मशीनच्या वापरावर राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता ईव्हीएम मशीनच्या वादात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली असून त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकीकडे विज्ञान, तंत्रज्ञान प्रगत होत असताना पुन्हा मतपत्रिकेचा (बॅलेट पेपर) आग्रह धरणे चुकीचे असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. याआधी मतपत्रिकेवर होणाऱ्या मतदानाला अधिक वेळ लागत होता. त्याशिवाय मतमोजणीसाठीही वेळ लागत असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. ईव्हीएम मशीनऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेणे म्हणजे मागे पाऊल टाकण्यासारखे असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.

ईव्हीएम मशीनमुळे उमेदवाराला कोणत्या भागातून किती मते मिळाली हे समजून येत असल्याचेही अण्णांनी म्हंटले. त्यामुळे टोटलाइजर मशीनचा वापर करावा अशी मागणी अण्णांनी केली आहे. याबाबत निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी म्हटले.

पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर बसपा अध्यक्षा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएम मशीनवर संताप व्यक्त केला होता. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महापालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी दिल्ली निवडणूक आयोगाकडे केली आहे.


Anna Hazare says ballot voting is regressive. #Watch a @TimesNow exclusive pic.twitter.com/TuzqK2ZE26 — TIMES NOW (@TimesNow) March 15, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज